मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chala Hawa Yeu Dya: सागर कारंडे नव्हे ‘पोस्टमन’च्या भूमिकेत नवीन कलाकार! ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक नाराज

Chala Hawa Yeu Dya: सागर कारंडे नव्हे ‘पोस्टमन’च्या भूमिकेत नवीन कलाकार! ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक नाराज

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 04, 2023 11:15 AM IST

Chala Hawa Yeu Dya New Postman: ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साकारत असलेले ‘पोस्टमन’ हे पात्र आता एका नव्या कलाकाराच्या हाती आले आहे.

Sagar Karande
Sagar Karande

Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरचा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतो. केवळ करमणूकच नाही तर, विनोदाच्या माध्यमातून अनेक गंभीर मुद्दे देखील या कार्यक्रमात सहज मांडले जातात. मात्र, सध्या हा शो चर्चेत आलाय तो यातील एका कलाकाराने कार्यक्रम सोडल्यामुळे... अभिनेता आणि महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर सागर कारंडे याने हा कार्यक्रम सोडल्याचे बोलले जात होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता या कार्यक्रमात दिसलेला नाही. अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला, तरी आता सागर कारंडे साकारत असलेले ‘पोस्टमन’ हे पात्र एका नव्या कलाकाराच्या हाती आले आहे. यावर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे हा ‘पोस्टमन काकां’ची भूमिका साकारायचा. या पात्राला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते. गावातून पत्र घेऊन येणारे, प्रेक्षकांना आनंद देऊन, हसता-हसता डोळ्यांत अंजन घालणारे हे पात्र सगळ्यांनाच आवडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे दिसत नसल्याने, आता ‘पोस्टमन’ हे पात्र कोण साकारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, नव्या भागात अभिनेत्री श्रेया बुगडे ‘पोस्टमन’ हे पात्र साकारताना दिसली आहे. यावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.

अभिनेत्री श्रेया बुगडे हिने नुकताच सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्टमनच्या वेशात श्रेया पत्र वाचताना दिसत आहे. मात्र, श्रेयाने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सागर कारंडे परत यावा म्हणून विनंती केली आहे.

एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘सागरदादाशिवाय "चला हवा येऊ द्या" शोचं बिना मिठाच्या जेवणासारखा झालंय..."बेचव"...आमच्या परिवाराने शो बघणंच बंद केलंय.... आता फक्त महाराष्ट्राची हास्य जत्राच फुल्ल जोरात सुरू आहे.’ ते, आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, ‘सागर दादाच्या आवाजात जी जादू आहे, ती श्रेया दिदिच्या आवाजात नाही.. आम्हाला पोस्टमन काका सागर दादाच हवे.......मिस यु सागर दादा’. चाहते आणि प्रेक्षक कमेंट्स करून सागर कारंडेला परतण्याची विनंती करताना दिसत आहेत.

IPL_Entry_Point