मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: मुंबईसह ३ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain: मुंबईसह ३ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Aug 09, 2022, 07:54 AM IST

    • Maharashtra Rain: येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Rain: येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    • Maharashtra Rain: येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain:राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात नद्या पात्राबाहेर पडल्या असून काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

मुंबईसह उपनगरात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. अद्याप लोकलसेवा सुरळीत सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मध्यरात्री मुंबईसह उपनगरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला.

हवामान विभागाने राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यातील अनेक भागात मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.