मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दर्शनाविना घरी गेलेल्या मुलीनं केली होती आत्महत्या, २ वर्षांनी लालबाग राजाच्या चरणी आईचं भावुक पत्र

दर्शनाविना घरी गेलेल्या मुलीनं केली होती आत्महत्या, २ वर्षांनी लालबाग राजाच्या चरणी आईचं भावुक पत्र

Sep 02, 2022, 09:58 AM IST

    • Lalbaugcha Raja: आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती.
लालबागचा राजा चरणी आईचे भावूक पत्र

Lalbaugcha Raja: आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती.

    • Lalbaugcha Raja: आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती.

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला राज्यातील भाविक दरवर्षी मोठी गर्दी करतात. यामुळे दर्शनासाठी मोठी रांगही लागते. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासह सर्वसामान्यांची संख्या मोठी असते. दर्शनाला येणारे भाविक लालबागच्या राजाच्या नवसपेटीत अनेक पत्रंही टाकत असतात. यातच दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईचं पत्र चर्चेत आहे. वाशीत राहणाऱ्या या महिला भाविकाने लालबाग राजाच्या चरणी पत्र लिहीत एक मागणी केलीय.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

वाशीत राहणाऱ्या महिलेच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुलगी आईसह आली होती. तेव्हा दर्शनाच्या रांगेत जवळपास ८ तास उभा रहावं लागलं होतं. त्यावेळी मुलीचा आणि तिथे असणाऱ्या गार्डचा वाद झाला होता. गार्डशी झालेल्या वादानंतर मुलीने आईला घेऊन तिथून घर गाठले होते. त्यानंतर सांयकाळी आत्महत्या केली होती. आता दोन वर्षांनी आईने लालबाग राजाच्या चरणी एक भावूक पत्र लिहिलं आहे.

आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती. त्यामुळे मुलीचे पाय दुखत होते. तेव्हा मुलगी तिथे ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकासोबत बोलायला गेली. तेव्हा त्याने मुलीला मनाला लागेल असे काहीतरी बोलला. त्याने चुकीच्या भाषेत दिलेल्या उत्तराने माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर रांगेतून बाहेर पडत ती मला घरी घेऊन गेली. मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं आणि संध्याकाळीच तिने गळफास घेत आत्महत्या केली."

पत्रात मुलीने तेव्हा काढलेलं एक चित्रही दाखवलं आहे. नवसाच्या रांगेत भाविकांना खुर्च्या द्याव्यात अशी मागणी या चित्रातून केली होती. आता आईने पत्रातून हीच मागणी करताना नवसाच्या रांगेतील भाविकांना खुर्च्या द्याव्यात, म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळेल असं पत्रात म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा