काश्मीरमधील वसंत ऋतू हा बदलांचा, चैतन्याचा आणि मंत्रमुग्ध करणारा ऋतु आहे. या काळात येथील निसर्ग बहरत असून याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात.
(HT Photo/Waseem Andrabi)बुधवारी श्रीनगरच्या दक्षिणेकडील पुलवामा जिल्ह्यातील गावात वसंत ऋतुमध्ये बदामाच्या बागेतून मेंढपाळ मेंढ्यांचा कळप पुढे जात असतांनाचे मनमोहक दृश.
(HT Photo/Waseem Andrabi)बहरलेली बदामाची झाडे काश्मीरमध्ये नैसर्गिक वैभव आणि नवचैतन्याच्या ऋतू असलेल्या वसंत ऋतुच्या आगमनाची जणू सूचना देतो.
(HT Photo/Waseem Andrabi)पुलवामा जिल्ह्यातील गावात वसंत ऋतूमध्ये बहरलेल्या मोहरीच्या शेतातून फिरतांना एक शेतकरी महिला.
काश्मीरमध्ये वसंत ऋतूचे आगमन होताच येथील निसर्गात मोठे बदल होतात. या काळात अनेक फुलांची झाडे बहरतात. यामुळे निसर्ग सौंदर्यात विविध रंगांची उधळण होते.