Bharat Jadhav Love Story: अरेंज मॅरेज ठरलं अन् लग्नाआधीच प्रेमात पडले! भरत जाधव यांची प्यारवाली लव्हस्टोरी...
Bharat Jadhav Love Story: सरिता आणि भरत जाधव यांचं लग्न हे अरेंज मॅरेज होतं. मात्र, त्या आधीच त्यांच्या लव्हस्टोरीत ट्वीस्ट आला होता.
Bharat Jadhav Love Story: मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते म्हणून भरत जाधव यांचे नाव नेहमीच घेतले जाते. ‘गलगले निघाले, ‘जत्रा’, ‘क्षणभर विश्रांती’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. तर, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’, ‘ऑल द बेस्ट’ अशा नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. आज जरी भरत जाधव यांना सुपरस्टार म्हटले जात असले, तरी त्यांचा हा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. आयुष्यात या प्रत्येक टप्प्यावर, आनंद असो वा दुःख, यश असो वा अपयश प्रत्येक पावला त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नी सरिता जाधव यांनी...
अभिनेते भरत जाधव नेहमीच आपल्या यशामध्ये आई-वडिलांनंतर पत्नीचा मोठा वाटा असल्याचं सांगतात. सरिताच्या पाठिंब्यामुळेच आज मी इथवर पोहोचू शकलो, असे ते म्हणतात. सरिता आणि भरत जाधव यांचं लग्न हे अरेंज मॅरेज होतं. मात्र, त्या आधीच त्यांच्या लव्हस्टोरीत ट्वीस्ट आला होता. अर्थात ही लव्हस्टोरी भरत आणि सरिता यांचीच होती. सरिता यांना भरत जाधव यांचं स्थळ सुचवण्यात आलं होतं. रीतीप्रमाणे दोघांनाही एकमेकांना भेटावं लागणार होतं.
भरत आणि सरिता यांचं लग्न जेव्हा जमत होतं, तेव्हा सरिता या नोकरी करत होत्या. भरत जाधव यांना भेटायला जाण्यासाठी त्यांना ऑफिसमधून लवकर निघण्यासाठी परवानगी घ्यायची होती. त्यावेळी त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी सरिता यांची गंमत केली होती. मात्र, भरत आणि सरिता यांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केले होते. सरिता यांना पाहताच क्षणी भरत जाधव त्यांच्या प्रेमात पडले होते. पहिल्या भेटीनंतर त्यांना सरिता यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता.
लग्न जमलं असलं तरी, दोघांमध्ये आधीचं प्रेम फुलू लागलं होतं. सरिता यांच्यासोबत अधिक वेळ घालवता यावा म्हणून भरत जाधव चित्रपट पाहायला जायचे. त्यांना अगदी एखादा चित्रपट बघू नये असे वाटत असेल तरी देखील ते चित्रपटगृहात जाऊन बसायचे. त्यांना आपला सगळा वेळ सरिता यांना द्यायचा होता. त्यांचं अरेंज मॅरेज लग्नाआधीच ‘लव्ह मॅरेज’मध्ये बदललं होतं.