Sukh Manje Nakki Kay Asta: जयदीपने केलेल्या व्रताचं फळ मिळणार, मालिकेत नवा ट्वीस्ट
Sukh Manje Nakki Kay Asta serial Update: सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा दसरा विशेष भागात गौरीची डिलिवरी झाल्याचे दाखवण्यात येणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं.' या मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत गौरीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला. आता शिर्के-पाटलांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.
वाचा: 'एकता कपूरच्या अटकेची बातमी खोटी', वकिलांनी केला खुलासा
दरम्यान, जीवघेण्या अपघातातून गौरी आणि बाळ वाचावं यासाठी जयदीपने कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घातलं. इतकंच नाही तर त्याने मोठ्या श्रद्धेने ते व्रत पूर्णही केलं. जयदीपला या व्रताचं फळ आता मिळणार आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी शिर्के पाटील कुटुंबात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. लक्ष्मीच्या आगमनाने आता मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
विभाग