मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : ईव्हीएम नसेल तर मोदी निवडणुका जिंकूच शकत नाहीत; असं का म्हणाले राहुल गांधी?

Video : ईव्हीएम नसेल तर मोदी निवडणुका जिंकूच शकत नाहीत; असं का म्हणाले राहुल गांधी?

Mar 18, 2024 05:05 PM IST Ganesh Pandurang Kadam
Mar 18, 2024 05:05 PM IST

Rahul Gandhi on EVM : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी, १७ मार्च रोजी मुंबईत समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ईव्हीएममधील घोटाळ्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदी हे ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाहीत. निवडणूक आयोग विरोधी पक्षांना किंवा तज्ज्ञां ना ही मतदान यंत्रं दाखवायलाही तयार नाही. मतदान केल्याच्या स्लीपची मोजणी करायला निवडणूक आयोग तयार नाही. कारण, ही यंत्रणा तुमच्या धनाची चोरी करणारी यंत्रणा आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp