मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “तुम्ही मारायला गेला होतात कुणाला, अन्..”, आव्हाडांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

“तुम्ही मारायला गेला होतात कुणाला, अन्..”, आव्हाडांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 10, 2022 04:27 PM IST

३ मे रोजी ईद झाल्यानंतर ४ मे पासून राज्यभर मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंवर निशाणा
जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंवर निशाणा

सांगली – सध्या  रात्री १० वाजल्यानंतर रस्त्यावरून कुठेही गेलात, तर सगळीकडे शांतता असते. देवळातून टाळ-मृदुंगाचा आवाज येतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सकाळी गेलेला शेतकरी रात्री परत येतो तेव्हा देवळात जातो. डोकं शांत करत भजन-कीर्तन करतो. आता तुमच्या आरत्या-भजन कीर्तन बंद झालं. तुम्ही मारायला गेला होतात कुणाला आणि मारलंत कुणाला. असं करायचं नसतं”, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावला.

स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात भांडणं लावून झाली. ते जमलं नाही. आता जाती-जातीत भांडणं लावतील”, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर केला. 

३ मे रोजी ईद झाल्यानंतर ४ मे पासून राज्यभर मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड बोलत होते.

राज्यात गुढीपाडव्यापासून मशिदींवरील भोंग्यांवरून मोठा वाद सुरू झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील तापू लागलं असताना आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरूनही राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. राज यांच्या दौऱ्याला राजकीय संघटनांकडून विरोध केला जात आहे. यूपीतील भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी तर राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला एकीकडे तीव्र विरोध होत असताना त्यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरेंनी सर्वात आधी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात, त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये आणि शेवटी १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यानंतर राज्य सरकारने भोंग्याबाबत नियमावली कडक करत अवैध लाऊडस्पीकर उतरवले. याचा फटका मशिदींबरोबरच हिंदू मंदिरांनाही बसला आहे. अनेक मंदिरातील भजन-कीर्तन व काकड आरत्या बंद झाल्या आहेत. यावरून आव्हान यांनी राज यांना टोला लगावला आहे.  

IPL_Entry_Point