Sukh Mhanje Nakki Kay Asta : कुणीतरी येणार गं! रंगणार गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम
गौरीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं.' या मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत गौरीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
वाचा : काजोलची पहिली वेबसीरिज येतेय! नावावरून अंदाज येईना; टीझरनं आणखी गोंधळ वाढवला, पाहाच!
माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळजेवणाची तयारी करण्यात आलीय. गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलंय. शालिनी आणि देवकी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय. शालिनीचा हा डाव यशस्वी होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
विभाग