Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होणार? कथानकात ट्वीस्ट!
Aai Kuthe Kay Karte Latest Update: अरुंधती, संजनानंतर आता अनिरुद्धच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची देखील एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या कथानक आता मोठा ट्वीस्ट येणार आहे. आधीच या मालिकेत नात्यांची गुंतागुंत पाहायला मिळत आहे. एकीकडे अभिषेक-अनघा, यश-गौरी आणि ईशा-अनिश यांच्या नात्यांची वीण सोडवतानाच अरुंधती स्वतःचा नवा संसार देखील सांभाळत आहे. मात्र, आता अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात नवे वादळ येणार आहे. अरुंधती, संजनानंतर आता अनिरुद्धच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची देखील एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आपल्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या संजनाच्या प्रेमात पडल्यावर अनिरुद्धने अरुंधतीसोबतचा २५ वर्षांचा मोडून संजानाशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता संजना आणि अनिरुद्धच्या संसारात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत. सततचे वाद आणि भांडणं यामुळे कंटाळून आता संजना आणि अनिरुद्ध यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र, त्या आधीच अनिरुद्धच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. मात्र, ही व्यक्ती नक्की कोण हे अद्याप समोर आलेले नाही.
मालिकेत लवकरच हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. संजना अनिरुद्धला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकणार आहे. अनिरुद्ध फोनवर कुणाशी तरी बोलताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगत असतो. त्यावेळी संजना त्याला प्रश्न विचारू लागते. मात्र, अनिरुद्ध तिला उडवाउडवीची उत्तर देतो. तेव्हाच संजनाला याचा संशय येतो. मात्र, अनिरुद्ध तिथून निघून जातो. आता या नव्या व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे देशमुखांच्या घरात मोठं वादळ येणार आहे. आता ही नवी व्यक्ती नक्की कोण असणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.