
भारतात सापांच्या ३५० हून अधिक प्रजाती आढळतात. काही राज्यांमध्ये साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तर काही राज्यांमध्ये ते अगदीच कमी आहे. त्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सापांचे प्रमाण जवळपास शून्य आहे.
भारतात एक असे राज्य आहे जिथे एकही साप आढळलेला नाही. त्यामुळे हे राज्य 'सर्पमुक्त' राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही या राज्यात नक्की जाऊ शकता.
भारतात अनेक प्रकारचे साप आढळले असले तरी त्यातील बहुतांश हे बिनविषारी आहेत. मात्र, अनेकांना सापांची भीती वाटते. सापांबाबत जागरुकता नसल्याने ही भीती बळगावी लागते. पण सापांच्या भीतीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही एखाद्या 'सर्पमुक्त' राज्यात जाऊ शकता.
हे राज्य दुसरे तिसरे कोणते नसून लक्षद्वीप आहे. जरी ते एक राज्य आहे असे म्हणता येणार नसले तरी केंद्रशासित प्रदेश आहे. येथे एकही साप आढळत नाही. लक्षद्वीपवर राहणाऱ्या लोकांची एकूण लोकसंख्या केवळ ६४ हजार आहे आणि इथल्या लोकांना सापांची भीती नाही.
लक्षद्वीपमध्ये ३६ बेटे आहेत. परंतु यापैकी फक्त १० बेटांवर वस्ती आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार कावरत्ती, अगट्टी, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, वित्रा, अंदोह, काल्पानी आणि मिनीकोय बेटांवर एकही साप नाही.




