Geeta Updesh : जेव्हा मनच बनतं व्यक्तीचा शत्रू, पाहा गीता उपदेशात काय सांगतात श्रीकृष्ण?
Aug 11, 2023, 04:07 AM IST
Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात.
Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात.
Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात.
महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.
काय सांगतात श्रीकृष्ण?
श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की जे मनावर नियंत्रण ठेवत नाही त्यांच्यासाठी त्यांचं मन शत्रूसारखे काम करते.
एखाद्याचा वर्तमान बघून त्याच्या भविष्याची चेष्टा करू नका कारण काळामध्ये इतकी ताकद असते की ती ताकद कोळशाचे हळूहळू हिऱ्यात रूपांतर करते.
गीतेत म्हटले आहे की भगवंत कधीच कोणाचे भाग्य लिहीत नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती आपले नशीब ठरवते.
श्रीकृष्ण म्हणतात, जर माझा भक्त शांतपणे माझ्यावर श्रद्धा ठेवत असेल आणि माझं सांगणं त्याला पटत असेल तर मी स्वतः त्याच्या मौनाला आणि त्याच्या श्रद्धेला उत्तर देतो...!!
गीतेनुसार वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे मानले आहेत. या तिन्ही गोष्टी आत्म-विनाशकारी मानल्या जातात.
श्रीकृष्ण म्हणतात, ना हे शरीर तुझे आहे, ना तू या देहाचा आहेस. हे शरीर अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश यांनी बनलेले आहे आणि शेवटी त्यात विलीन होईल पण आत्मा अमर आहे, मग तुम्ही काय आहात? देव म्हणतो की हे मनुष्या! तुम्ही भगवंताला शरण जा. हाच सर्वोत्तम आधार आहे. जो त्याचा आधार जाणतो तो भय, चिंता आणि दु:खापासून कायमचा मुक्त होतो.
गीतेनुसार, तुमच्या नशिबात असलेलं तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या नशीबाचं सर्व काही मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग