Geeta Updesh : नियती हे आपल्या भूतकाळातल्या कर्मांचं फळ आहे असं का म्हणतात श्रीकृष्ण?
Aug 09, 2023, 04:03 AM IST
Shree Krishna Arjuna Samvaad : गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.
Shree Krishna Arjuna Samvaad : गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.
Shree Krishna Arjuna Samvaad : गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.
महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.
काय म्हणतात श्रीकृष्ण?
नियती हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे असे गीतेत सांगितले आहे. त्याचप्रमाणे वर्तमानात आपण करत असलेली कृती आपलं भविष्य ठरवते.
गीतेमध्ये असे लिहिले आहे की जे स्पष्ट आणि थेट बोलतात, त्यांचे बोलणे कठोर असेल, परंतु ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत.
गीतेत लिहिले आहे, चांगले विचार ठेवा, लोक आपोआप तुम्हाला आवडू लागतील, चांगले हेतू ठेवा, काम आपोआपच चांगले होऊ लागेल.
श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, हे पार्थ! अहंकार, गर्व, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व राक्षसी लक्षणे आहेत. या गोष्टींचा त्याग करूनच माणूस चांगला माणूस बनू शकतो.
जीवनात तीन मंत्रांचे नेहमी स्मरण करावे असे श्रीमद्भागवत गीतेमध्ये सांगितले आहे. आनंदात कोणाला वचन देऊ नये, रागात उत्तर देऊ नये आणि दु:खात कोणताही निर्णय घेऊ नये.
श्रीकृष्णाच्या मते, राग येणे हा वाईट स्वभाव आहे, परंतु तो कुठे आवश्यक आहे ते दाखवले पाहिजे. अन्यथा, चूक करणाऱ्याला आपण काहीतरी चुकीचे करत आहोत हे कधीच कळणार नाही. अशा परिस्थितीत, तो नेहमीच तुमच्याशी तसाच वागेल जसा तो वागत आला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग