Geeta Updesh : जीवनात हरून किंवा पळून जाऊन सुखी राहाता येत नाही असं का म्हणतात श्रीकृष्ण?
Aug 10, 2023, 04:09 AM IST
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.
महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत.
महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला. अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथीमहारथी त्याचे काका,मामा,आजोबा, भाऊ होते. आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो? असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात धनुष्य खाली ठेवलं.त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याचा सारथी आणि साक्षात परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरं दिली. यालाच गीता असं म्हटलं गेलं आहे. गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.
१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.
काय सांगतात श्रीकृष्ण?
टीकेपासून दूर राहा: ज्या लोकांना खरोखर आनंदी राहायचे आहे ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत. इतरांवर टीका केल्याने आपलाच आनंद नष्ट होतो. ज्या लोकांना आनंदी राहायचे आहे ते स्वतःच्या आनंदाबरोबरच इतरांच्या आनंदाकडेही लक्ष देतात.
तुलना: भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात कोणाशीही तुलना करू नये. देवाने जे काही दिले आहे त्यात आनंदी राहावे असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच असे लोक नेहमी आनंदी असतात जे इतरांशी आपली तुलना करत नाहीत.
तक्रार करणे: तक्रार केल्याने तुम्हाला बरे वाटू शकते, परंतु यामुळे समस्या सुटत नाही. जे लोक आनंदी असतात त्यांना हे चांगलेच ठावूक असते आणि म्हणूनच ते कोणाचीही तक्रार करत नाहीत.
भूतकाळाबद्दल काळजी करणे: भूतकाळात हरवले जाणे किंवा भूतकाळाबद्दल चिंता करणे. त्यामुळे तुमचा वेळ तर वाया जातोच, पण भूतकाळामुळे तुम्ही आनंदापासून दूर जाता. ज्यांना हे समजते, ते भूतकाळाचा विचार करण्याऐवजी वर्तमानात आनंदी असतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग