Jadu Tona Tips : तुमच्यावर कोणी जादूटोणा केला आहे का ते कसं ओळखणार? हे संकेत सांगतील, वाचा
May 08, 2024, 08:14 PM IST
- Tips for negative energy : तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूचा उपयोग शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केला जातो. कधी कधी त्याचा गैरवापरही होतो. असे मानले जाते की जेव्हा एखाद्यावर काळी जादू किंवा चेटूक केले जाते तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात अनेक नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
Tips for negative energy : तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूचा उपयोग शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केला जातो. कधी कधी त्याचा गैरवापरही होतो. असे मानले जाते की जेव्हा एखाद्यावर काळी जादू किंवा चेटूक केले जाते तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात अनेक नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
- Tips for negative energy : तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूचा उपयोग शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केला जातो. कधी कधी त्याचा गैरवापरही होतो. असे मानले जाते की जेव्हा एखाद्यावर काळी जादू किंवा चेटूक केले जाते तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात अनेक नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
अनेक वेळा आयुष्यात अचानक नकारात्मकता दिसू लागते आणि त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. पण याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण हे काळ्या जादूचे किंवा घरात प्रचलित नकारात्मक उर्जेचे लक्षण असू शकते.
आपल्यावर कोणी काळी जादू केली आहे, हे कसे ओळखणार? याबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.
ही चिन्हे दिसतात
तंत्रशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सतत पैशाची हानी, मानसिक तणाव, भीती किंवा नैराश्य येत असेल तर ते नकारात्मक उर्जेची उपस्थिती दर्शवू शकते.
तसेच, ज्या व्यक्तीवर चेटूक किंवा काळी जादू केली जाते ती व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमावते. तो विचित्र गोष्टी करू लागतो.
जेव्हा घरातील तुळस सुकते
जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले तर ते घरातील नकारात्मक ऊर्जा सूचित करते. अशा स्थितीत व्यक्तीने ताबडतोब सावध होणे गरजेचे आहे.
हे उपाय नक्की करा
घरातील जादूटोण्याचे प्रभाव दूर करण्यासाठी सुंदरकांडाचे पठण करा. तसेच, पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण करा. असे केल्याने फायदा दिसेल.
या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वारावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यासोबतच फरशी पुसण्याच्या पाण्यात सैंधव मीठ घाला आणि नियमितपणे साफसफाई करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते.
यासोबत पिवळी मोहरी, गुग्गुळ, लोबान, गाईचे तूप मिसळून उद तयार करा. सूर्यास्ताच्या वेळी शेणाच्या पोळीवर हा धूप जाळावा. तुम्हाला हे किमान २१ दिवस करावे लागेल. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
विभाग