मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : व्यक्तीमध्ये 'हे' पाच गुण असल्यास त्याच्या जीवनात नसते मानसन्मानाची कमतरता

Geeta Updesh : व्यक्तीमध्ये 'हे' पाच गुण असल्यास त्याच्या जीवनात नसते मानसन्मानाची कमतरता

Aug 13, 2023, 04:09 AM IST

  • Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

गीता उपदेश (Pixabay )

Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

  • Shree Krishna Arjuna Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला. अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथीमहारथी त्याचे काका,मामा,आजोबा, भाऊ होते. आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो? असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात धनुष्य खाली ठेवलं.त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याचा सारथी आणि साक्षात परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरं दिली. यालाच गीता असं म्हटलं गेलं आहे. गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.

काय म्हणतात श्रीकृष्ण?

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये पाच गुण असले पाहिजेत आणि ते म्हणजे शांतता, सौम्यता, मौन, आत्मसंयम आणि पवित्रता. या पाच गोष्टी मनाला शिस्त लावतात. श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असले पाहिजेत तरच तो योग्य मार्गावर चालू शकतो.

गीतेमध्ये सांगितले आहे की चांगल्याबरोबर चांगले राहा, परंतु वाईटाबरोबर वाईट राहू नका. कारण हिरा हिऱ्याने कापता येतो पण चिखल चिखलाने साफ करता येत नाही.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की आपले भाग्य हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे. त्याचप्रमाणे आज आपण करत असलेली कृती आपला उद्या ठरवेल.

गीतेमध्ये असे म्हटले आहे की तुम्ही कोणाचे नशीब बदलू शकत नाही, पण किमान त्याला चांगली प्रेरणा देऊन मार्गदर्शन करू शकता. श्रीकृष्णाच्या मते, जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बनावं, स्वार्थी नाही.

अहंकार माणसाला ते सर्व करायला लावतो जे शेवटी त्याच्या विनाशाचे कारण बनते. म्हणूनच माणसाने लवकरात लवकर आपला अहंकार सोडला पाहिजे.

श्री कृष्ण म्हणतात की कर्म म्हणजे ते पीक आहे जे माणसाला प्रत्येक परिस्थितीत स्वतःला घ्यावे लागते, म्हणून नेहमी चांगले बी पेरा म्हणजे पीक चांगले येईल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या