Geeta Updesh : विचार हा प्रत्येक माणसाचा शत्रू किंवा मित्र असतो, असं का सांगतात श्रीकृष्ण?
Aug 12, 2023, 04:04 AM IST
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला.
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला.
Shree Krishna Arjun Samvaad : महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला.
महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत.
महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.
काय म्हणतात श्रीकृष्ण?
श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की योग्य वेळेची वाट बघून स्वतःला फसवू नका कारण योग्य वेळ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही ती योग्य करण्यासाठी प्रयत्न कराल.
गीतेमध्ये असे लिहिले आहे की फक्त भ्याड आणि कमकुवत लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नियती किंवा नशिबावर अवलंबून नसतात.
गीतेनुसार, केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो.
श्रीकृष्ण म्हणतात की अडचणी फक्त सर्वोत्तम लोकांच्याच वाट्याला येतात कारण त्यांना उत्तम प्रकारे पार पाडण्याची ताकद फक्त त्या लोकांमध्ये असते.
जे सहज मिळतो त्याला त्याचं महत्त्व नसतं, अनेकदा ते गमावल्यावर वेळ, व्यक्ती आणि नात्याची किंमत कळते.
श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे. शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा.
तुम्ही आनंदी आहात की दुःखी हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहाल. जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल. विचार हा प्रत्येक माणसाचा शत्रू आणि मित्र असतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग