मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur news : पंढरपूर हळहळले! शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Pandharpur news : पंढरपूर हळहळले! शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Jan 14, 2024, 07:07 AM IST

    • Pandharpur News: पंढरपूरमधील करकंब येथे शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
, Pandharpur News

Pandharpur News: पंढरपूरमधील करकंब येथे शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

    • Pandharpur News: पंढरपूरमधील करकंब येथे शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मोडनिंब रस्त्याजवळ असणाऱ्या परदेशी यांच्या शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावांवर दुख:चा डोंगर कोसळला असून नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Mumbai RailwayMegablock : मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडतांना वेळापत्रक तपासा

मनोज अंकुश पवार (वय ११), गणेश नितीन मुरकुटे (वय ७), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. गणेश आणि हर्षवर्धन हे दोघे भाऊ आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात ही मुळे गेली होती. खेळत असतांना ही तिन्ही मुळे येथील शेतात असलेल्या शेत तळ्यात पडली. दरम्यान, ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी तातडीने शेतात धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने या तलावात उतरून तिन्ही मुलांना बाहेर काढले. करकंब पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Mumbai Air Show 2024 : हवाई दलाच्या सूर्यकिरण, सारंग, एरोबॅटिक पथकाच्या हवाई कसरतींनी मुंबईकर शहारले! पाहा फोटो

त्यांनी तातडीने या तिन्ही मुलांना तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून मनोज शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ही मुले तलावात कधी उतरली. या घटनेमागे काही घात पात तर नाही ना या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर, गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या