Health Care Tips: ही फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आरोग्याला पोहोचते हानी, जाणून घ्या याचे कारण
May 05, 2024, 05:43 PM IST
- Avoid Water After Eating Fruits: काही फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, जेव्हा तुम्ही रसाळ, पाणी असलेली फळं खाल्ल्यानंतर जास्त लिक्विड पिता तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
Avoid Water After Eating Fruits: काही फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, जेव्हा तुम्ही रसाळ, पाणी असलेली फळं खाल्ल्यानंतर जास्त लिक्विड पिता तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
- Avoid Water After Eating Fruits: काही फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, जेव्हा तुम्ही रसाळ, पाणी असलेली फळं खाल्ल्यानंतर जास्त लिक्विड पिता तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
Side Effects of Drinking Water After Eating Fruits: अनेक लोकांना फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला घरातील मोठे लोक देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो. तसं तर हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. पण तरी काही फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. का माहित आहे? जाणून घ्या कारण आणि कोणती फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका
टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास त्याचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकवर परिणाम होतो. वास्तविक टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. साखर आणि फायबर देखील समाविष्ट आहे. टरबूज खाऊन पाणी प्यायल्यावर बॅक्टेरिया थेट पोटात पोहोचतात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
खरबूज
टरबूज सोबतच खरबूज देखील गोड आणि रसाळ फळांमध्ये गणले जाते. खरबूज खाल्ल्यानंतरही पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण खरबूजमध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रक्टोज असते, जी थेट पोटात पोहोचते आणि पचन बिघडते.
रसाळ फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका
काकडी, स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षे इत्यादी फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. पाणी असलेली फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पोटाची पीएच पातळी बिघडते. शिवाय अतिसार होण्याची आणि पचनसंस्था बिघडण्याची भीती असते.
केळी
केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू लागते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
जांभूळ
जांभूळचा देखील त्या फळांमध्ये समावेश होतो, जे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास सर्दी होण्याचा धोका असतो.
किती वेळानंतर पाणी प्यावे
तज्ज्ञांच्या मते कोणतेही रसदार फळ खाल्ल्यानंतर एक तासानंतरच पाणी किंवा दूध यासारखे इतर कोणतेही लिक्विड प्यावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)