मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: तू ती चूक पुन्हा करू नकोस; संजनाने अरुंधतीला केली विनंती! नेमकं कारण काय?

Aai Kuthe Kay Karte: तू ती चूक पुन्हा करू नकोस; संजनाने अरुंधतीला केली विनंती! नेमकं कारण काय?

Feb 19, 2023, 12:33 PM IST

    • Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे.
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे.

    • Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे.

Aai Kuthe Kay Karte Latest Update:आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. एकीकडे देशमुख कुटुंबातील काही मंडळी या लग्नाच्या तयारीत गुंतली आहेत. तर, काही मंडळी मात्र हे लग्न कसं थांबवता येईल, याच्या योजना आखत आहेत. यातच आता संजना देखील अरुंधतीला अशी काही विनंती करणार आहे, ज्यामुळे अरुंधतीसह प्रेक्षक देखील गोंधळात पडणार आहेत. तू ती चूक पुन्हा करू नकोस, असं संजना अरुंधतीला सांगणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

लग्नाच्या तयारीच्या दरम्यान संजना अरुंधतीकडे येते आणि तिला म्हणते की, जेव्हा मी अनिरुद्धसोबत काम करत होते, तेव्हा त्याने मला सपोर्ट केला. पण मी जेव्हा प्रमोद बरोबर काम करायला लागले, तेव्हा तो बदलला. तू हे लक्षात घे आणि ती चूक करू नकोस. तू या आधी एकदा ही चूक करून झाली आहेस.’ यावेळी अरुंधती देखील तिचं बोलणं ऐकून गोंधळून जाताना दिसली. आता संजना अरुंधतीला नेमकं काय सांगू इच्छित होती हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अरुंधती आशुतोषशी लग्न करत असल्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांना सांगते. मात्र तिचा हा निर्णय कांचन, अभी आणि अनिरुद्धला खटकतो. तर संजना, आप्पा, यश हे अरुंधतीच्या या निर्णयात तिला पाठिंबा देतात. अनिरुद्ध दोघांच्या लग्नात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या संकटांवर मात करत आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न थाटामाटात पार पडणार आहे.

आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न होऊ नये यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात आता चांगलाच गदारोळ माजला आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडावं म्हणून अनिरुद्ध नवनव्या शकला लढवताना दिसत आहे.

पुढील बातम्या