मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

May 08, 2024, 01:12 PM IST

  • Hyderabad Rain हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत. 

Hyderabad: Vehicles move on a flooded road following heavy rain, in Hyderabad, Tuesday, May 7, 2024. (PTI Photo)(PTI05_07_2024_000563B) (PTI)

Hyderabad Rain हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत.

  • Hyderabad Rain हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत. 

हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे बाचुपल्ली भागात निर्माणाधीन अपार्टमेंटची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक चार वर्षांच्या मुलाचा समावेश असल्याचं पोलिसानी सांगितलं. सर्व मृत नागरिक हे ओडिशा आणि छत्तीसगडमधील स्थलांतरित मजूर होते, असं पोलिसांनी सांगितलं.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बुधवारी सकाळी ढिगाऱ्याखालून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तेलंगणात विविध भागांत काल, मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हैदराबादसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. हैदराबाद शहरात साचलेलं पाणी उपसण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी आपत्ती निवारण दलाची (डीआरएफ) पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorology Department) बुधवारी तेलंगणात 'यलो' अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यनम, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काही भागांत पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे’ असं हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

७ ते १२ मे २०२४ दरम्यान केरळ आणि माहे येथे वादळी वाऱ्यासह (३०-४० किमी प्रती तास वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

Hyderabad: Police at the site after a retaining wall at an under construction apartment collapsed due to heavy rains in Bachupally area, in Hyderabad, Tuesday night.

भारतात उष्णतेची लाट कायम

गेल्या काही आठवड्यांपासून भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्यानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात ८ मे ते १० मे दरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि कर्नाटकमध्ये आज, बुधवारपासून उष्णतेची लाट कमी होण्यास सुरूवात होणार आहे.

मंगळवारी राजस्थानमध्ये ४५.२ अंश सेल्सिअस, मध्य प्रदेशात ४४.८ अंश सेल्सिअस तर दिल्लीत ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्लीतले तापमान हे या उन्हाळ्याच्या मोसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान होते. यापूर्वी ६ मे रोजी राजधानी दिल्लीत ४१.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

दरम्यान, एप्रिल महिन्यात भारताच्या पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भागात विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली असून या भागातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा सरकारी यंत्रणांकडून देण्यात आला आहे. काही राज्यांनी शाळेचे वर्ग स्थगित केले असून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

पुढील बातम्या