Mumbai Crime News : दांडिया खेळण्यास मनाई केल्यानं मुंबईत तिघांवर हातोड्यानं हल्ला, एकाचा मृत्यू
Sep 29, 2022, 10:44 AM IST
- Navi Mumbai Crime News : दांडियात सहभागी होण्यासाठी मनाई केल्यानं एका व्यक्तीनं तिघांवर लोखंडी हातोड्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.
Navi Mumbai Crime News : दांडियात सहभागी होण्यासाठी मनाई केल्यानं एका व्यक्तीनं तिघांवर लोखंडी हातोड्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.
- Navi Mumbai Crime News : दांडियात सहभागी होण्यासाठी मनाई केल्यानं एका व्यक्तीनं तिघांवर लोखंडी हातोड्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.
Navi Mumbai Crime News : सध्या नवरात्र सुरू असल्यानं राज्यातील अनेक भागांमध्ये दांडिया खेळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. अनेक ठिकाणी लोक दांडियाचा आनंद घेत आहे. परंतु नवी मुंबईत एका व्यक्तीला दांडिया खेळण्यास मनाई केल्यानं त्यानं थेट तीन लोकांवर लोखंडी हातोड्यानं वार करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून बाकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रबाळे पोलीस ठाणे परिसरात आरोपी जितेंद्र पटवा हा एका ठिकाणी दांडिया खेळायला गेला होता. त्यावेळी आयोजकांनी त्याला दांडिया खेळण्यास मनाई केल्यानं त्याला प्रचंड राग आला. त्यानंतर त्यानं लोखंडी हातोड्यानं तिघांवर वार करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अभिषेक भालेराव आणि रशीद खान या दोघांना गंभीर मार लागला आहे. त्यामुळं आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आरोपीनं हातोड्यानं हल्ला केल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या लोकांना एकच धक्का बसला. प्रत्यक्षदर्शींनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीनं तिघांवर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभाग