मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दंगल भडकावली; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दंगल भडकावली; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

Apr 02, 2023, 04:26 PM IST

    • Sambhajinagar Violence : हिंसाचारातील आरोपींचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत, त्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची फूस होती, याचीही चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.
BJP MP Anil Bonde On Sambhajinagar Violence (HT)

Sambhajinagar Violence : हिंसाचारातील आरोपींचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत, त्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची फूस होती, याचीही चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

    • Sambhajinagar Violence : हिंसाचारातील आरोपींचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत, त्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची फूस होती, याचीही चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

BJP MP Anil Bonde On Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीतील आरोपींना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची फूस होती, असा खळबळजनक आरोप भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यामुळं अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असून हिंसाचारातील प्रमुख आरोपींना राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस होती, त्यामुळं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करायला हवी, अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. संभाजीनगर येथील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात असतानाच आता भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आल्यामुळं यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

माध्यमांशी बोलताना भाजपा खासदार अनिल बोंडे म्हणाले की, संभाजीनगर येथील हिंसाचारातील प्रमुख आरोपी रियाजुद्दीन आमि कदीर मौलाना यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. त्यांना राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याची फूस होती?, याचाही शोध घ्यायला हवा, असं म्हणत अनिल बोंडे यांनी थेट राष्ट्रवादीवर दंगल भडकावल्याचा आरोप केला आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आल्यानंतर शहरात अशांततेचे प्रयत्न केले जात असल्याचंही बोंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या कदीर मौलाना यांना निवडणूक लढवायची आहे. त्याचा मुलगा रियाजुद्दीन हा नेमका त्याच दिवशी भांडण करतो. त्यानंतर संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण होते. ते मंदिरात आसऱ्याला जातात. त्यानंतर तिथं जाळपोळ सुरू होते. हे सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचं कारस्थान आहे. परंतु दंगलीच्या या कटामागे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. संभाजीनगर येथे हिंसाचार झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत, कायदा व सुव्यस्थेवर आरोप करण्यासाठी त्यांना दंगल भडकवावी लागते, असाही आरोप बोंडे यांनी केला आहे.

पुढील बातम्या