मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Sabha: लोकसभेपूर्वी मनोज जरांगे वातावरण ढवळून काढणार, तब्बल ९०० एकरमध्ये घेणार विराट सभा

Manoj Jarange Sabha: लोकसभेपूर्वी मनोज जरांगे वातावरण ढवळून काढणार, तब्बल ९०० एकरमध्ये घेणार विराट सभा

Mar 09, 2024, 05:07 PM IST

  • Manoj Jarange Sabha Beed : बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी भव्य सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तब्बल ९०० एकर जागेवर ही विराट सभा होणार आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये ९०० एकरवर सभा

Manoj Jarange Sabha Beed : बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी भव्य सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तब्बल ९०० एकर जागेवर ही विराट सभा होणार आहे.

  • Manoj Jarange Sabha Beed : बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी भव्य सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तब्बल ९०० एकर जागेवर ही विराट सभा होणार आहे. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, तसेच  सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. मनोज जरांगे यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा लाखोंच्या संख्येने एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मनोज जरांगे यांची सभा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. बीड जिल्ह्यात ही भव्य सभा होणार असून यासाठी मैदानाची पाहणी सुरू केली आहे. मराठा समाजाकडून या सभेची तयारी सुरू केली असून आतापर्यंतची सर्वात विराट अशी ही सभा असणार आहे.

राज्य सरकारने (Maratha Reservation) मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच ज्वलंत बनला आहे. सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण आम्हाला मान्य नसून ओबीसीमधून आरक्षण हवं असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हे आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधताना म्हटले की, फडणवीस सत्तेचा वापर करून गुंडशाही आणि दडपशाही करत आहेत. यामुळे पुन्हा कोट्यवधी समाजबांधव एकवटणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. जालन्यात राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले असता त्यांना मराठा तरुणांनी गाडीतून उतरूही न देता माघारी पाठवलं.

पुढील बातम्या