मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Power Outage : कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये शुक्रवारी वीजपुरवठा बंद, नेमकं कारण काय?

Power Outage : कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये शुक्रवारी वीजपुरवठा बंद, नेमकं कारण काय?

May 18, 2023, 11:43 PM IST

    • Power Outage In Kalyan : कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
Power Outage In Kalyan, Ulhasnagar and Ambernath (REUTERS)

Power Outage In Kalyan : कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

    • Power Outage In Kalyan : कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Power Outage In Ulhasnagar and Ambernath : पडघा ते मोहने दरम्यानच्या वीज वाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणमधील वीजपुरवठा बंद राहणार आहे. याबाबातची माहिती महापारेषणने जारी केली असून शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत तिन्ही उपनगरांमध्ये वीज खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सकाळी वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे मुंबईसह ठाण्यातील तापमानात मोठी वाढ होत असतानाच आता वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळं सामान्यांची मोठी अडचण होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर कारवाईचा बडगा, 'त्या' दोन पब्सना टाळे

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

पडघा ते मोहने येथे अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचं काम महावितरणने हाती घेतलं आहे. त्यामुळं शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणमधील वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळं कल्याणमधील संदीप हॉटेल, सह्याद्री नगर, आरटीओ कार्यालय परिसर, योगीधाम, गौरीपाडा, सिनेमॅक्स परिसर, बिर्ला कॉलेज रोड आणि शहाड या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

उल्हासनगर शहरातील मुरलीधर नगर, अंबरनाथ पाणीपुरवठा, लालचक्की मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, कृष्णानगर, झेडपी हिल, लक्ष्मीनगर, कैलासनगर, पनवेलकर ग्रीन सिटी, मिरची वाडी, दीपकनगर, नवरे पार्क, ईश्वर रेसिडेन्सी, मुरलीधरनगर, गणेशनगर, नवीन भेंडीपाडा, भास्करनगर, कामगार पुतळा, बुवापाडा, घाडगेनगर, खुंटवली, बालाजीनगर, न्यु कॉलनी, मातोश्रीनगर, अष्टविनायक कॉलनी, स्वामीनगर, केमीकल झोन, वडळगाव, जसानी, लालचक्की, स्टेशनरोड, भाजी मार्केट, मातोश्रीनगर, मोरीवली, चिखलोली एमआयडीसी, आयटीआय आणि शिवाजीनगर या भागांमध्येही शुक्रवारी वीजपुरवठा बंद असेल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या