मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik : अयोध्येहून परतताच मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश

Nashik : अयोध्येहून परतताच मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश

Apr 10, 2023, 05:27 PM IST

    • Eknath Shinde In Nashik : अयोध्येचा दौरा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.
CM Eknath Shinde In Satana Nashik (HT)

Eknath Shinde In Nashik : अयोध्येचा दौरा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

    • Eknath Shinde In Nashik : अयोध्येचा दौरा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

CM Eknath Shinde In Satana Nashik : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं अयोध्येचा दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. सटाणा तालुक्यातील निताने, बिजोटे, आखतवाडे शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली असून नासाडी झालेल्या शेतीपिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री

राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती समजताच आम्ही सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले. आता नुकसानग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर पंचनामे केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असतील तिथं सरकार त्यांच्या मदतीला धावून येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याशिवाय राज्यात सध्या शेतकऱ्यांचं सरकार असून आम्ही बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. तो सर्वांना जगवतो. त्यामुळं त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान येण्यासाठी मी प्रभू श्रीरामांना साकडं घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या