मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water issue : बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; पालिकेने ठोठावला ७५ कोटींचा दंड

Mumbai Water issue : बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; पालिकेने ठोठावला ७५ कोटींचा दंड

Apr 07, 2023, 08:52 AM IST

  • Mumbai Water problem : बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळे लाखो मुंबईकरांवर पाणी कपात ओढवल्या गेल्याचे तपासात पुढे आले आहे. वागळे इस्टेट येथे बोरवेल खोदातांना १८ फुट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडले आहे.

Water Issue

Mumbai Water problem : बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळे लाखो मुंबईकरांवर पाणी कपात ओढवल्या गेल्याचे तपासात पुढे आले आहे. वागळे इस्टेट येथे बोरवेल खोदातांना १८ फुट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडले आहे.

  • Mumbai Water problem : बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळे लाखो मुंबईकरांवर पाणी कपात ओढवल्या गेल्याचे तपासात पुढे आले आहे. वागळे इस्टेट येथे बोरवेल खोदातांना १८ फुट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडले आहे.

मुंबई : मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. एका बिल्डरच्या चुकीमुळे ही घटना घडली असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल पालिकेने घेतली असून पाच महिन्यांत नासाडी झालेल्या पाण्याची रक्कम आणि दंड असे ७५ कोटी रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावे, असे पत्र पालिकेने ‘एमआयडीसी’ला दिल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

वागळे इस्टेट या ठिकाणी बोअरवेल खोदत असतांना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. तब्बल ५ महीने पाणी वाया गेले. या प्रकरणी एका नागरिकाने बांधकाम व्यावसायिकाविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या व्यावसायिकाची चूक मुंबईकरांना महागात पडली आहे.

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांब जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याला ठाणे येथे बोअरवेल खोदकामादरम्यान भगदाड पडले होते. या जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी मुंबईत पाणी कपात करण्यात आली होती.

तब्बल १ महिना १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना का घडली याचा तपास करत असतांना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदत असतांना बिल्डरला या पाइपलाइनचा अंदाज आला नाही. यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या १८ मीटर व्यासाच्या जलबोगद्याला मोठे भगदाड पडले. हा प्रकार येथील एका नागरिकाला समजल्यावर त्याने बिल्डर विरोधात तक्रार दिली. एवढेच नाही तर हा प्रकार मागील पाच महिन्यांपासून सुरू होता. लाखो लिटर पाणी या दरम्यान वाया गेले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या