मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sahkutumb Sahaparivar: अमेयनंतर ‘सहकुटुंब सहपरिवार’मधून आणखी एका अभिनेत्याची झाली एक्झिट?

Sahkutumb Sahaparivar: अमेयनंतर ‘सहकुटुंब सहपरिवार’मधून आणखी एका अभिनेत्याची झाली एक्झिट?

Jan 24, 2023, 11:40 AM IST

    • Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत चार भावांची कथा दाखवण्यात आली असून, यात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत.
Sahkutumb Sahaparivar

Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत चार भावांची कथा दाखवण्यात आली असून, यात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत.

    • Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत चार भावांची कथा दाखवण्यात आली असून, यात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत.

harsSahkutumb Sahaparivar: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ सध्या प्रेक्षकांना नात्यांचं महत्त्व पटवून देतेय. चार भावांच्या कुटुंबाची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. मालिका यशाच्या शिखरावर असताना यातील काही कलाकार मालिका सोडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील ‘वैभव’ अर्थात अभिनेता अमेय बर्वे याने या मालिकेला रामराम ठोकला होता. यानंतर आता आणखी एक अभिनेता या मालिकेतून बाहेर पडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मालिकेत सध्या चार भावांपैकी एकाचा म्हणजेच पश्या या पात्राचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मालिकेत ‘पश्या’ हे पात्र अभिनेता आकाश नलावडे साकारत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आकाश या मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे आता आकाशने देखील ही मालिका सोडली का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता अमेय बर्वे याने ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका सोडली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत चार भावांची कथा दाखवण्यात आली असून, यात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेता अमेय गोरे, आकाश नलावडे आणि आक्श शिंदे हे कलाकार त्यांच्या भावाची भूमिका साकारत आहेत. मात्र, अमेय याने नुकतीच ही मालिका सोडली असून, त्याच्या जागी आता एक नवा अभिनेता दिसत आहे. अमेयने ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. तर, आता आकाशने देखील मालिका सोडली की ब्रेक घेतला याची माहिती समोर आलेली नाही.

पुढील बातम्या