Rang Maza Vegla: आयेशाचं सत्य समोर आणण्यासाठी दीपा-कार्तिक रचणार डाव! सुखी संसारावरचं अरिष्ट दूर होणार?
Jul 16, 2023, 11:20 AM IST
Rang Maza Vegla Latest Episode: आयेशाचा डाव उघडा पडावा म्हणून कार्तिक आणि दीपा मिळून सगळे प्रयत्न करणार आहेत.
Rang Maza Vegla Latest Episode: आयेशाचा डाव उघडा पडावा म्हणून कार्तिक आणि दीपा मिळून सगळे प्रयत्न करणार आहेत.
Rang Maza Vegla Latest Episode: आयेशाचा डाव उघडा पडावा म्हणून कार्तिक आणि दीपा मिळून सगळे प्रयत्न करणार आहेत.
Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता नवा ट्वीस्ट येणार आहे. कार्तिक आणि दीपाला आता सगळं सत्य कळलं आहे. त्यामुळे आता आयेशाचा डाव उघडा पडावा म्हणून कार्तिक आणि दीपा मिळून सगळे प्रयत्न करणार आहेत. एकीकडे आयेशाला वेड लागल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे कार्तिक आणि दीपाला ती हे ढोंग करत असल्याचं लक्षात आलं आहे. मात्र, केवळ डॉक्टरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आयेशाला खरंच वेड लागलं असावं, यावर विश्वास ठेवला आहे. आयेशाला मानसिक धक्का बसलेला असून, ती एका वेगळ्याच भ्रामक विश्वात जगत आहे.
आयेशाला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आता खऱ्या कार्तिकने तिच्या समोर यायला हवं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचाच आधार घेऊन आता कार्तिक आणि दीपा एक नवा डाव रचणार आहे. या योजनेनुसार दीपा मुद्दाम आयेशाच्या समोर वेगाने गाडी घेऊन येणार असून, या अपघातादरम्यान कार्तिक येऊन आयेशाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या घटनेत कार्तिक आयेशासमोर येणार आहे. आता कार्तिक आयेशासमोर येणार असून, तेव्हा तरी आयेशाचं ढोंग उघड होणार का? हे लवकरच कळणार आहे.
Atul Parchure: ‘त्या चुकीच्या उपचारांमुळे त्रास आणखी वाढला’; कॅन्सरविषयी पहिल्यांदाच बोलले अतुल परचुरे
कार्तिकला मिळवण्यासाठी आयेशाने अनेक प्रयत्न केले होते. मात्र, तिचे सगळेच प्रयत्न फोल ठरले. कार्तिकला मिळवण्यासाठी तिने साम, दाम, दंड, भेद सगळेच मार्ग वापरले. यात तिने आपल्या मार्गात आलेल्या प्रत्येकाला जीवानिशी संपवले. यातच तिने कार्तिक आणि दीपा यांची मैत्रीण साक्षी हिचा जीव घेतला. तिला चुकीचे इंजेक्शन देऊन तिने साक्षीचा जीव घेतला. मात्र, या खूनाचा आळ पूर्णपणे कार्तिकवर आला. या गुन्ह्यात कार्तिकला तब्बल १४ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
आता कार्तिक १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून बाहेर आला आहे. मात्र, दीपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असं समजून तो दीपाचा बदल घेत होता. मात्र, आता त्याला सगळं सत्य कळलं आहे. त्यामुळे तो आता दीपाच्या सोबतीने आयेशाचा पर्दाफार्श करणार आहे.