Mangalwar Upay : शनिच्या महादशेने हैराण झाला असाल तर आज करा 'हे' उपाय
Feb 28, 2023, 07:26 AM IST
घरात काही विघ्नं असतील किंवा कोणत्याही समस्येने हैराण झाला असाल तर आज मारुतीच्या देवळात किंवा श्रीगणेशाच्या देवळात जाऊन काही उपाय केल्यास विघ्नं दूर होतात असं सांगितलं जातं.
घरात काही विघ्नं असतील किंवा कोणत्याही समस्येने हैराण झाला असाल तर आज मारुतीच्या देवळात किंवा श्रीगणेशाच्या देवळात जाऊन काही उपाय केल्यास विघ्नं दूर होतात असं सांगितलं जातं.
घरात काही विघ्नं असतील किंवा कोणत्याही समस्येने हैराण झाला असाल तर आज मारुतीच्या देवळात किंवा श्रीगणेशाच्या देवळात जाऊन काही उपाय केल्यास विघ्नं दूर होतात असं सांगितलं जातं.
आज २८ फेब्रुवारी २०२३. आजचा दिवस मंगळवार. मंगळवार हा मुख्यत्वे मारुती आणि गणेशाला समर्पित दिवस आहे. घरात काही विघ्नं असतील किंवा कोणत्याही समस्येने हैराण झाला असाल तर आज मारुतीच्या देवळात किंवा श्रीगणेशाच्या देवळात जाऊन काही उपाय केल्यास विघ्नं दूर होतात असं सांगितलं जातं. मंगळवारच्या दिवशी कोणते उपाय केले गेले पाहिजेत हे आज आपण पाहाणार आहोत.
मंगळवारी कोणते उपाय करावे
मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर कोणत्याही हनुमान मंदिरात जावे. तेथे हनुमानाला दिवा, फूल, हार अर्पण करा. त्यानंतर तिथे बसून १०८ वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. यानंतर तुमचे संकट दूर करण्यासाठी बजरंग बलीला प्रार्थना करा. हा उपाय दर मंगळवारी आणि शनिवारी करावा. हा उपाय केल्यावर कुंडलीतील सर्व ग्रह शुभ फळ देऊ लागतात.
शनिची महादशा असल्यास काय करावे
कुंडलीत शनीची महादशा चालू असेल किंवा शुभ ग्रहांवर शनीच्या दृष्टीमुळे अशुभ प्रभाव पडत असेल तर मंगळवारी १०८ तुळशीच्या पानांवर पिवळ्या चंदनाने रामाचे नाव लिहावे. त्यानंतर या पानांची माळ बनवून मारुतीरायाला वाहावी. यामुळे शनि, मंगळ आणि राहूशी संबंधित सर्व दोष लगेच दूर होतात. जो हा उपाय करतो त्याला कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही.
श्रीगणेशांना लाल फुलं अर्पण करावी
मंगळवारी गणपती बाप्पाला लाल वस्त्र, लाल फुले, लाल फळे आणि उकडीचे मोदक अर्पण करावे. यामुळे इच्छित फल मिळते.
गरजूंना अन्नदान करावे
मंगळवारी, सकाळी किंवा दुपारी अशा ठिकाणी जा जेथे माकडे खूप आहेत. त्यांना गूळ, केळी, हरभरा, शेंगदाणे इत्यादी खाद्यपदार्थ द्या. शक्य असल्यास गरजूंनाही अन्न द्या. यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करा. लवकरच पैसे तुमच्याकडे येऊ लागतील. लक्षात ठेवा हा उपाय सूर्यास्तानंतर करू नये. गरजूंना अन्नदान कधीही करणे उत्तम, परंतु त्यांना अन्नासाठी पैसे देऊ नका, तर फक्त त्याला खायला द्या.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)
विभाग