मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Geeta Updesh : कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Aug 17, 2023, 06:55 AM IST

  • Shree Krishna Arjuna Samvaad : श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म कर असा सल्ला दिला. माणसाच्या हातात कर्म करणे इतकंच आहे. मग आपण कोणतं कर्म केल्यास आपल्याला कोणतं फळ मिळेल याची अपेक्षा ठेवणं चूक आहे असं श्रीकृष्ण सांगतात.

गीता उपदेश (Pixabay)

Shree Krishna Arjuna Samvaad : श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म कर असा सल्ला दिला. माणसाच्या हातात कर्म करणे इतकंच आहे. मग आपण कोणतं कर्म केल्यास आपल्याला कोणतं फळ मिळेल याची अपेक्षा ठेवणं चूक आहे असं श्रीकृष्ण सांगतात.

  • Shree Krishna Arjuna Samvaad : श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म कर असा सल्ला दिला. माणसाच्या हातात कर्म करणे इतकंच आहे. मग आपण कोणतं कर्म केल्यास आपल्याला कोणतं फळ मिळेल याची अपेक्षा ठेवणं चूक आहे असं श्रीकृष्ण सांगतात.

महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.

काय म्हणतात श्रीकृष्ण?

श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की, मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती ठेवणे चुकीचे आहे. श्रीकृष्णाच्या मते ही आसक्तीच व्यक्तीच्या दु:खाचे आणि अपयशाचे कारण आहे. जास्त आसक्तीने व्य़क्तीमध्ये राग आणि दुःख या भावना जन्माला घालते. यामुळे ती व्यक्ती आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच माणसाने अती आसक्ती टाळली पाहिजे.

श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, काम करताना व्यक्तीचं आपल्या मनावर असणारं नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. कामावर श्रद्धा ठेवणं आणि ते कर्म करताना क्रोध टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे केलेले काम बिघडू शकतं. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

गीतेनुसार, व्यक्तीने कधीही आपल्या कर्मावर संशय घेऊ नये. असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो. त्यामुळे यश मिळवायचे असेल तर जे काम कराल ते पूर्ण विश्वासाने पूर्ण करा, तरच तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल.

श्रीमद्भागवत गीतेनुसार फळाची अपेक्षा करू नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि पुढे जा.या शिवाय तुमच्या मनातला इतर कोणताही विचार तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून विचलित करू शकतो.

श्रीकृष्णाच्या मते, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आत दडलेले भय नाहीसे केले पाहिजे. हा धडा देताना कृष्णाने अर्जुनाला सांगितले की, हे अर्जुना, निर्भयपणे युद्ध कर. युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य मिळेल. म्हणूनच तुझ्या मनातील भीती काढून टाक.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या