मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : एखाद्याला फसवणं हे एखाद्या कर्जासारखं आहे, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Geeta Updesh : एखाद्याला फसवणं हे एखाद्या कर्जासारखं आहे, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Aug 08, 2023, 06:41 AM IST

  • Krishna Arjun Samvaad : एखाद्याशी केलेलं वाईट वर्तन हे एखाद्या कर्जासारखं आहे आणि आज ना उद्या त्याची परतफेड होतेच असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

गीता उपदेश (Pixabay )

Krishna Arjun Samvaad : एखाद्याशी केलेलं वाईट वर्तन हे एखाद्या कर्जासारखं आहे आणि आज ना उद्या त्याची परतफेड होतेच असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

  • Krishna Arjun Samvaad : एखाद्याशी केलेलं वाईट वर्तन हे एखाद्या कर्जासारखं आहे आणि आज ना उद्या त्याची परतफेड होतेच असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत. एकात भगवान कृष्ण अर्जुनाला अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करतात

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.

काय म्हणतात श्रीकृष्ण?

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की एखाद्याला फसवणे हे ऋण आहे, याची परतफेड एक ना एक दिवस ती व्यक्ती तुम्हाला करणार यात शंकाच नाही

गीतेत असे लिहिले आहे की काळाचे चक्र खूप वेगाने फिरते. म्हणूनच आपल्या सामर्थ्याचा किंवा संपत्तीचा अभिमान बाळगू नका!

आयुष्याची प्रत्येक पैज जिंकायची असेल तर शक्तीपेक्षा बुद्धिमत्तेचा वापर करा. कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला.

श्रीमद भागवत गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, जर तुम्हाला कोणतेही काम करण्याची भीती वाटत असेल तर हे लक्षात ठेवा की तुमचे कार्य खरोखरच शौर्याने भरलेले आहे.

गीतेनुसार, डोळे आपल्याला फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कोणामध्ये काय पाहातो हे आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असतं.

श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने भगवंतात विलीन व्हावे. माणसाला देवाशिवाय कोणी नाही. यासोबतच माणूसही कोणाचाच नाही, असे गृहीत धरून काम केले पाहिजे.

भोगातून मिळणारा आनंद हा तात्पुरता असतो तर त्यागातून मिळणारा आनंद हा शाश्वत असतो. श्रीकृष्ण म्हणतात की भगवंताच्या कृपेने सत्संग तर मिळतोच पण कुसंगती मनुष्य आपल्या कर्मांनी मिळवतो.

गीतेनुसार, विजय-पराजय तुमच्या विचारांवर अवलंबून आहे, तुम्ही स्वीकारले तर पराभव होईल आणि जर तुम्ही दृढनिश्चय केलात तर विजयी व्हाल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या