Geeta Updesh : मनुष्याने कधीही 'या' दोन परिस्थितीत निर्णय घेऊ नयेत, असं का म्हणतात श्रीकृष्ण?
Aug 03, 2023, 04:07 AM IST
Shree Krishna Arjun Samvaad : अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे धडे देतो. अर्जुनाला काय करावं आणि काय नाही याबद्दल उपदेश करतो. हा उपदेश आपल्याला रोजच्या जीवनातही उपयोगी पडतो.
Shree Krishna Arjun Samvaad : अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे धडे देतो. अर्जुनाला काय करावं आणि काय नाही याबद्दल उपदेश करतो. हा उपदेश आपल्याला रोजच्या जीवनातही उपयोगी पडतो.
Shree Krishna Arjun Samvaad : अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे धडे देतो. अर्जुनाला काय करावं आणि काय नाही याबद्दल उपदेश करतो. हा उपदेश आपल्याला रोजच्या जीवनातही उपयोगी पडतो.
महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला. अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथीमहारथी त्याचे काका,मामा,आजोबा, भाऊ होते. आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो? असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात धनुष्य खाली ठेवलं.त्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना त्याचा सारथी आणि साक्षात परमेश्वर श्रीकृष्णाने उत्तरं दिली. यालाच गीता असं म्हटलं गेलं आहे. गीतेत फक्त कृष्ण अर्जुन संवादच नाहीत. तर गीतेत आयुष्याचं सार सांगण्यात आलं आहे. मनुष्याने कशी कर्म करावी, कोणाशी कसं वागावं? याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जातं.
१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.
काय सांगतात श्रीकृष्ण?
श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की एखादी व्यक्ती खूप आनंदी किंवा खूप दुःखी असताना कधीही निर्णय घेऊ नये कारण या दोन्ही परिस्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. आधी मन स्थिर करा आणि मगच नीट विचार करून निर्णय घ्या.
गीतेमध्ये असे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात विनाकारण समस्या येत नाहीत. समस्या येणे हे लक्षण आहे की आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी बदलण्याची आवश्यकता आहे.
श्रीकृष्णाच्या मते, जर तुम्हाला कोणी संधी दिली तर त्याला फसवू नका आणि जर कोणी तुम्हाला फसवले तर त्याला पुन्हा संधी देऊ नका.
गीतेमध्ये असे लिहिले आहे की दोन क्षणांचा राग प्रेमळ नाते नष्ट करतो आणि चेतना नेहमी वेळ गेल्यावरच येते.
गीतेनुसार, केवळ दाखवण्यासाठी चांगले बनू नये, कारण देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो.
श्रीकृष्ण सांगतात की, रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर किमान शंभर दिवसांचे दुःख टाळता येते. प्रत्येक व्यक्तीने रागाच्या वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.
श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, पराभव आणि विजय आपल्या विचारांवर अवलंबून असतो, जर आपण ते स्वीकारले तर तो पराभव आहे आणि जर आपण दृढनिश्चय केला तर तो विजय आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग