मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Varuthini Ekadashi : वरुथिनी एकादशीला या ५ गोष्टींचे करा दान; लक्ष्मी कृपा राहील आणि अडचणी होतील दूर

Varuthini Ekadashi : वरुथिनी एकादशीला या ५ गोष्टींचे करा दान; लक्ष्मी कृपा राहील आणि अडचणी होतील दूर

Apr 29, 2024, 04:28 PMIST

Varuthini ekadashi 2024 : वरुथिनी एकादशीला काही खास गोष्टींचे दान करावे, असे मानले जाते की हे कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया. 

  • Varuthini ekadashi 2024 : वरुथिनी एकादशीला काही खास गोष्टींचे दान करावे, असे मानले जाते की हे कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया. 
शनिवार ४ मे २०२४ रोजी वरुथिनी एकादशी व्रत आहे. जे लोक या दिवशी व्रत करू शकत नाहीत त्यांनी काही विशेष वस्तूचे दान करावे, हे कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी असल्याचे मानले जाते.
(1 / 7)
शनिवार ४ मे २०२४ रोजी वरुथिनी एकादशी व्रत आहे. जे लोक या दिवशी व्रत करू शकत नाहीत त्यांनी काही विशेष वस्तूचे दान करावे, हे कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी असल्याचे मानले जाते.
वरुथिनी एकादशीला अन्नदान केल्याने लोक, देवता आणि पितरांना समाधान मिळते. अन्नदान करणे हे शास्त्रानुसार कन्यादान करण्यासारखे मानले जाते. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते.
(2 / 7)
वरुथिनी एकादशीला अन्नदान केल्याने लोक, देवता आणि पितरांना समाधान मिळते. अन्नदान करणे हे शास्त्रानुसार कन्यादान करण्यासारखे मानले जाते. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते.
वरुथिनी एकादशीला पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करणे उत्तम मानले जाते. उन्हाळा असल्यामुळे पाणपोई देखील लावू शकतात. असे मानले जाते की, यामुळे मुलांना दीर्घायुष्य मिळते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
(3 / 7)
वरुथिनी एकादशीला पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करणे उत्तम मानले जाते. उन्हाळा असल्यामुळे पाणपोई देखील लावू शकतात. असे मानले जाते की, यामुळे मुलांना दीर्घायुष्य मिळते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.(PTI)
एकादशीला काळे तीळ नदीत पाण्यात वाहून द्यावे. असे म्हणतात यामुळे हरी आणि शनि खूप प्रसन्न होतात. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.
(4 / 7)
एकादशीला काळे तीळ नदीत पाण्यात वाहून द्यावे. असे म्हणतात यामुळे हरी आणि शनि खूप प्रसन्न होतात. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.(Freepik )
मे महिन्यात उष्णता शिगेला असते. अशा परिस्थितीत वरुथिनी एकादशीला सत्तूचे दान करणे शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि भाग्यदायक ठरते.
(5 / 7)
मे महिन्यात उष्णता शिगेला असते. अशा परिस्थितीत वरुथिनी एकादशीला सत्तूचे दान करणे शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि भाग्यदायक ठरते.
एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी केळी, आंबा आणि इतर रसाळ फळे गरजूंना वाटल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच शनिही प्रसन्न होतो.
(6 / 7)
एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी केळी, आंबा आणि इतर रसाळ फळे गरजूंना वाटल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच शनिही प्रसन्न होतो.
वरुथिनी एकादशीला बूट, चप्पल किंवा छत्रीही दान करता येतात. असे म्हणतात की जे गरजूंना मदत करतात, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करतात. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(7 / 7)
वरुथिनी एकादशीला बूट, चप्पल किंवा छत्रीही दान करता येतात. असे म्हणतात की जे गरजूंना मदत करतात, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करतात. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.(Freepik)

    शेअर करा