मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maharashtra Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, राज्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या

Maharashtra Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, राज्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या

Oct 06, 2023, 03:32 PMIST

Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतून मान्सून परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळं हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

  • Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतून मान्सून परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळं हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Weather Update : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
(1 / 5)
Maharashtra Weather Update : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाऊस गायब झाला असून राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
(2 / 5)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाऊस गायब झाला असून राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचं तापमान झपाट्याने खालावलं आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी पडत आहे. तसेच धुक्यानेही हजेरी लावली आहे.
(3 / 5)
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचं तापमान झपाट्याने खालावलं आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी पडत आहे. तसेच धुक्यानेही हजेरी लावली आहे.(Hindustan Times)
मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत असली तरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
(4 / 5)
मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत असली तरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
पुढील दोन तीन दिवसांत कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या तापमानात घट होणार असून थंडी वाढणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
(5 / 5)
पुढील दोन तीन दिवसांत कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या तापमानात घट होणार असून थंडी वाढणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.(HT PHOTO)

    शेअर करा