मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Updates : मुंबईकरांना परतीच्या पावसाचा अखेरचा सलाम, काय आहे हवामान अंदाज?

Mumbai Rain Updates : मुंबईकरांना परतीच्या पावसाचा अखेरचा सलाम, काय आहे हवामान अंदाज?

Oct 07, 2023, 01:03 PMIST

Mumbai Rain Updates : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परंतु तरीदेखील कोकणातील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असल्याचं चित्र आहे.

  • Mumbai Rain Updates : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परंतु तरीदेखील कोकणातील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असल्याचं चित्र आहे.
Maharashtra Rain Update : Mumbai Rain Updates : सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात धुंवाधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
(1 / 5)
Maharashtra Rain Update : Mumbai Rain Updates : सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात धुंवाधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.(Sai Saswat Mishra)
हवामान खात्याने ४ ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु २ ऑक्टोबर पासूनच मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणच्या हवामानात मोठे बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
(2 / 5)
हवामान खात्याने ४ ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु २ ऑक्टोबर पासूनच मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणच्या हवामानात मोठे बदल होत असल्याचं दिसून येत आहे.(PTI)
पुढील दोन तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि वाशी परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून माघारी फिरत असल्याने यंदाच्या हंगामातील हा अखेरचा पाऊस असणार आहे.
(3 / 5)
पुढील दोन तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि वाशी परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून माघारी फिरत असल्याने यंदाच्या हंगामातील हा अखेरचा पाऊस असणार आहे.
मुंबईकरांना अखेरचा सलाम करत मान्सून माघारी फिरणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतूनही पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
(4 / 5)
मुंबईकरांना अखेरचा सलाम करत मान्सून माघारी फिरणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतूनही पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.(फोटो - पीटीआय)
Mumbai Rain update : मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून पूर्णपणे माघारी फिरताच कोकणासह मुंबईत थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून पावसाने चिंब भिजत असलेल्या मुंबईकरांना आता थंडीचा सामना करावा लागणार आहे.
(5 / 5)
Mumbai Rain update : मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून पूर्णपणे माघारी फिरताच कोकणासह मुंबईत थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून पावसाने चिंब भिजत असलेल्या मुंबईकरांना आता थंडीचा सामना करावा लागणार आहे.

    शेअर करा