मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cumin Water Benefits: हिवाळ्यात उपयुक्त आहे जिरे पाणी, फायदे ऐकून घ्यायला सुरू कराल

Cumin Water Benefits: हिवाळ्यात उपयुक्त आहे जिरे पाणी, फायदे ऐकून घ्यायला सुरू कराल

Jan 17, 2023, 01:08 PMIST

Health Benefits of Cumin Water: जिऱ्याचे पाणी शरीरासाठी फायद्याचे आहे. हे पाणी विशेषतः हिवाळ्यात का प्यावे? जाणून घ्या.

  • Health Benefits of Cumin Water: जिऱ्याचे पाणी शरीरासाठी फायद्याचे आहे. हे पाणी विशेषतः हिवाळ्यात का प्यावे? जाणून घ्या.
जिऱ्याचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे चव आणि वास वाढवणे. पण त्यापलीकडे इतरही अनेक फायदे आहेत. जिऱ्याच्या नियमित सेवनाने आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, पचनाच्या समस्या दूर करण्यास, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आणि अशक्तपणा दूर करण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत होते. जिरे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक प्रकारे काम करते.
(1 / 7)
जिऱ्याचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे चव आणि वास वाढवणे. पण त्यापलीकडे इतरही अनेक फायदे आहेत. जिऱ्याच्या नियमित सेवनाने आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, पचनाच्या समस्या दूर करण्यास, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आणि अशक्तपणा दूर करण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत होते. जिरे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक प्रकारे काम करते.
जिऱ्यामध्ये लोह, तांबे, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, जस्त आणि पोटॅशियम असते. विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला त्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती असेल, तर तुम्ही हे पाणी या हिवाळ्यात दररोज रिकाम्या पोटी पिऊ शकता.
(2 / 7)
जिऱ्यामध्ये लोह, तांबे, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, जस्त आणि पोटॅशियम असते. विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला त्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती असेल, तर तुम्ही हे पाणी या हिवाळ्यात दररोज रिकाम्या पोटी पिऊ शकता.
अपचनापासून आराम : अनेकांना हा त्रास होतो. अपचनाच्या समस्येमुळे अनेकांना खूप त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिणे सुरु करू शकता. रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे अपचन दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
(3 / 7)
अपचनापासून आराम : अनेकांना हा त्रास होतो. अपचनाच्या समस्येमुळे अनेकांना खूप त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिणे सुरु करू शकता. रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे अपचन दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
वजन कमी करते: जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी जिऱ्याचे पाणी त्या कामात मदत करू शकते. हे शरीरातील सर्व प्रकारचे प्रदूषक काढून टाकते. जर तुमची पचनक्रिया चांगली असेल. यामुळे चरबी आणि वजन दोन्ही लवकर कमी होतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे भिजवलेले पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
(4 / 7)
वजन कमी करते: जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी जिऱ्याचे पाणी त्या कामात मदत करू शकते. हे शरीरातील सर्व प्रकारचे प्रदूषक काढून टाकते. जर तुमची पचनक्रिया चांगली असेल. यामुळे चरबी आणि वजन दोन्ही लवकर कमी होतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे भिजवलेले पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: जिरे पाणी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यात पोटॅशियम, लोह आणि फायबर असते. जर तुम्ही जिऱ्याचे पाणी नियमित प्यायले तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल.
(5 / 7)
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: जिरे पाणी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यात पोटॅशियम, लोह आणि फायबर असते. जर तुम्ही जिऱ्याचे पाणी नियमित प्यायले तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल.
मधुमेह नियंत्रित करते: मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी जिरे टाकलेले पाणी फायदेशीर पेय असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप प्रभावी आहे. जिरे आपल्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवते. तसेच साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
(6 / 7)
मधुमेह नियंत्रित करते: मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी जिरे टाकलेले पाणी फायदेशीर पेय असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप प्रभावी आहे. जिरे आपल्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवते. तसेच साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
रक्तदाब नियंत्रित करते: जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही सुरक्षितपणे जिरे भिजवलेल्या पाण्याचे सेवन करू शकता. त्यात पोटॅशियम असते. हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे आपल्या शरीराच्या योग्य कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच जिरे भिजवलेले पाणी पिल्याने मिठाचे हानिकारक प्रभाव संतुलित राहतात. परिणामी रक्तदाब नियंत्रित राहतो.
(7 / 7)
रक्तदाब नियंत्रित करते: जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही सुरक्षितपणे जिरे भिजवलेल्या पाण्याचे सेवन करू शकता. त्यात पोटॅशियम असते. हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे आपल्या शरीराच्या योग्य कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच जिरे भिजवलेले पाणी पिल्याने मिठाचे हानिकारक प्रभाव संतुलित राहतात. परिणामी रक्तदाब नियंत्रित राहतो.

    शेअर करा