मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार, कारण काय?

Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार, कारण काय?

Feb 16, 2024, 11:38 PM IST

    • R Ashwin withdraws from third Test against England: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारतीय कसोटी संघातून तात्काळ माघार घेतली आहे.
India's Ravichandran Ashwin walks back to the pavilion at the end of the second day (AP)

R Ashwin withdraws from third Test against England: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारतीय कसोटी संघातून तात्काळ माघार घेतली आहे.

    • R Ashwin withdraws from third Test against England: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारतीय कसोटी संघातून तात्काळ माघार घेतली आहे.

भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

"कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल", असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटपटू आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देतो. खेळाडूंचे आणि त्यांच्या नातेवाईक आणि प्रियजनांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या आव्हानात्मक काळातून जात असताना अश्विन आणि त्याच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती बोर्डाने केली आहे. बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहील आणि आवश्यकतेनुसार मदत देण्यासाठी त्याच्याशी संपर्कात राहतील.

BCCI च्या वॉर्निंगनंतरही ईशान किशनचे रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष, आता IPL मधून पत्ता कटणार?

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला आर अश्विनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाच सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वीच हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून माघार घेतली. तर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याची माहिती होती. मात्र, काही दिवसानंतर विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती समोर आली.

या मालिकेत अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले. इंग्लंडचा जॅक लीचला गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला संघाबाहेर पडावे लागले. त्यानंतर भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल देखील दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. भारताचा युवा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात तो संघाच्या प्लेईंगमध्ये भाग आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या