Rang Maza Vegla: दीपाविरोधात श्वेता आणि आयेशा पुन्हा करणार हातमिळवणी! ‘रंग माझा वेगळा’ रंजक वळणावर
Aug 07, 2023, 05:09 PM IST
Rang Maza Vegla Latest Update: दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते.
Rang Maza Vegla Latest Update: दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते.
Rang Maza Vegla Latest Update: दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते.
Rang Maza Vegla Latest Update: छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची नांदी होताना दिसत आहे. लवकरच अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. टीव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका देखील आता शेवटच्या टप्प्याकडे जाताना दिसत आहेत. एकीकडे दीपा आणि कार्तिक स्वतःचा संसार वाचवण्यासाठी लढत असताना आता त्यांच्या मुलींवर देखील मोठं संकट कोसळणार आहे. दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली अर्थात दीपिका आणि कार्तिकी दोघीही एकाच मुलाच प्रेमात पडल्याचे नुकतेच समोर आले आहे.
दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. मात्र, आता त्याच्यासमोर देखील आपल्या आजीचे आणि मावशीचे खरे रूप आले आहे. त्यामुळे त्याने देखील सत्याची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. यात तो दीपिकावर मनापासून खरंप्रेम करू लागला होता. मात्र, त्याच हे खोटं रूप कार्तिकी आणि दीपिका दोघींसमोर आलं. आपल्या बहिणीच्या सुखासाठी जरी दीपिकाने आर्यनला नकार दिला असला तरी कार्तिकी मात्र खूप बिथरली आहे.
Jailer: ‘जेलर’च्या सेटवर रजनीकांत यांनी मागितली जॅकी श्रॉफची माफी! कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक
नकुलला मिळवण्यासाठी कार्तिकीने दीपिकासह सगळ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली होती. या दरम्यान तिने श्वेताची मदत घ्यायचा ही प्रयत्न केला. तर, श्वेताने आपण तुला मदत करतोय असं भासवून वेगळाच डाव रचला. आर्यन आणि कार्तिकीचं भांडण झाल्यावर श्वेताने कार्तिकीला किडनॅप केले. तर, याचा सगळा दोष आता आर्यांवर आला आहे. मात्र, आर्यनची आजी देशमुख बाई यांनी या मागच्या खऱ्या सूत्रधाराला अर्थात श्वेताला शोधून काढले. आता दोघींनी मिळून नवा डाव रचला असून, त्या दोघी मिळून दीपा आणि कार्तिकला त्रास देणार आहेत.
दुसरीकडे आता दीपाने देखील शपथ घेतली आहे की, ती कार्तिकीला शोधून काढण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत उतरणार आहे. आपल्या मुलींना त्रास देणाऱ्या सगळ्यांना चांगला धडा शिकवणार असल्याचे तिने ठरवले आहे.