Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता शेवटच्या दिशेने वळू लागली आहे. मात्र, त्यातही मालिकेत अनेक नवनवे ट्वीस्ट येताना दिसणार आहेत. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात आता दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात दुरावा येताना दिसणार आहे. मात्र, यावेळेस त्यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण सौंदर्या इनामदार असणार आहे. सौंदर्या इनामदार स्वतः दीपा आणि कार्तिकला एकमेकांपासून वेगळं व्हायला सांगणार आहे. दीपा आणि कार्तिकचं नातं आता एका नव्या वळणावर पोहोचलं आहे.
एकीकडे दीपा आणि कार्तिकच्या नात्यात दुरावा निर्माण होत असताना आता त्यांच्या मुलींच्या आयुष्यात देखील वादळ आलं आहे. दीपिका आणि कार्तिकी यांच्या आयुष्यात आलेला मुलगा हा कच असून, त्याने दोघींची फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन हाच दीपिका आणि कार्तिकी या दोघींनाही एकाच वेळी प्रेमात पाडून त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करत आहे. मात्र, ही गोष्ट आता दोघींच्याही लक्षात आली आहे. तर, आर्यन हा केवळ माझा आहे, असा हट्ट कार्तिकीने धरला आहे. तर, दीपिका आपल्या नात्यात मध्ये आल्याचा तिचा समज झाला आहे.
आता आर्यनमुळे दीपिका आणि कार्तिकीच्या आयुष्यात मोठँ वादळ येणार आहे. आता कार्तिकी आर्यनला मिळवण्यासाठी दीपिका विरोधात वेगवेगळे कट रचणार आहे. तिने दीपिकाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हीच गोष्ट ती आपली आई म्हणजेच दीपाला देखील सांगणार आहे. मात्र, हा कार्तिकीच्या प्लानचा एक भाग असल्याचे समोर येणार आहे. कार्तिकी श्वेतासोबत हातमिळवणी करून दीपा आणि दीपिकाला त्रास देण्याचा डाव आखत आहेत. यातच आता ती आर्यनला धरून दीपाच्या समोर त्याची ओळख उघड करणार आहे. तर, या दरम्यान कार्तिकी स्वतः किडनॅप होणार आहे.'
दुसरीकडे, आयेशाला शिक्षा घडावी म्हणून सुरू केलेला प्लान आता स्वतः दीपाच्या संसारावर भारी पडताना दिसणार आहे. कार्तिक हा आपलाच पती असल्याचा दावा आयेशाने केला आहे. तर, आता दीपा आणि कार्तिकच्या संसारात वादळ येताना पाहून स्वतः सौंदर्या इनामदारच दोघांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा सल्ला देणार आहे. आता दीपा आणि कार्तिक नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या