Rang Maza Vegla: अखेर आयेशा गुन्ह्याची कबुली देणार! ‘रंग माझा वेगळा’चा शेवट गोड होणार?
Sep 01, 2023, 04:54 PM IST
Rang Maza Vegla Latest Episode 1 September 2023: अखेर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. अखेर आयेशा आपल्या गुन्ह्याची कबुली देणार असून, तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode 1 September 2023: अखेर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. अखेर आयेशा आपल्या गुन्ह्याची कबुली देणार असून, तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode 1 September 2023: अखेर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. अखेर आयेशा आपल्या गुन्ह्याची कबुली देणार असून, तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode 1 September 2023: ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सगळ्याचंच लक्ष आता या मालिकेच्या शेवटाकडे लागलं आहे. अखेर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. अखेर आयेशा आपल्या गुन्ह्याची कबुली देणार असून, तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे. आयेशा आपणच साक्षीचा खून केल्याचे सांगणार आहे. यानंतर पोलीस आयेशाला पकडून घेऊन जाणार आहे. अशारीतीने मालिकेचा गोड शेवट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शेवटच्या दोन-तीन भागात देखील प्रेक्षकांना धमाकेदार कथानक पाहायला मिळालं आहे. दीपा आणि कार्तिक यांचा प्लॅन फसण्याची शक्यता असतानाच बाजी पालटणार आहे. श्वेताला दीपा आणि कार्तिकचा सगळा प्लॅन आधीच कळला होता. दीपा आणि कार्तिक खोटं नाटक करत आहेत, असा संशय श्वेताला आधीपासूनच होता. या दरम्यान तिने दीपा आणि कार्तिक यांच्या प्रत्येक हालचालीवर डोळा ठेवण्यास सुरुवात केली होती. यातच तिला दीपा, कार्तिकी आणि दीपिकाचा सगळा प्लॅन ऐकायला मिळाला होता.
Kushi Movie Review: समंथा आणि विजय देवरकोंडाची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली; पाहा काय म्हणाले नेटकरी...
श्वेताने हा सगळा डाव आयेशाला देखील सांगायचा प्रयत्न केला. सौंदर्या इनामदारने आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर, श्वेता मात्र हा डाव कसा उधळता येईल याचा विचार करत होती. हे सगळं नाटक असून, तुझं आणि कार्तिकचं लग्न कधीच होणार नाही, असं श्वेता आयेशाला सांगितलं होतं. मात्र, आयेशाने श्वेताच्या बोलण्यावर बिलकुल विश्वास ठेवला नाही. ती एका विचित्र मानसिक स्थितीत अडकल्याने तिने लग्नाला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याच लग्नात तिचं सगळं सत्य समोर येणार आहे.
ठरल्या प्लॅननुसार दीपा कार्तिकचा खोटा खून करणार आहे. आयेशासोबत सात फेरे घेत असतानाच दीपाने कार्तिकवर बंदूक ताणली होती. अखेर तिने कार्तिकला गोळी मारली आणि चिडलेल्या आयेशाने जाऊन दीपासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दीपा आणि आयेशा यांच्या वादात आयेशा आपण कार्तिकसाठीच साक्षीचा खून केल्याचं सत्य सांगणार आहे. यावेळी पोलीस आयेशाला अटक करून घेऊन जाणार आहेत.