Nikhil Bane:स्नेहल शिदमसोबत लग्न करणार?; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने दिली प्रतिक्रिया
Feb 11, 2023, 08:39 AM IST
- Nikhil Bane: निखिल बनेने एका यूट्यूबरला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
Nikhil Bane: निखिल बनेने एका यूट्यूबरला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
- Nikhil Bane: निखिल बनेने एका यूट्यूबरला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' या दोन्ही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमात काम करणाऱ्या विनोदवीरांना तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. 'चला हवा येऊ द्या'मधील स्नेहा शिदम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. या चर्चा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता निखिल बनेने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्नेहा शिदमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती निखिल बनेसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने 'पिरतीच्या फडात ग, धरता हात असा, काळीज येंधलं आरल...' असे कॅप्शन दिले होते. त्यामुळे ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर निखिलने प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: प्रेमाचे रंग उलघडणारा 'जग्गू आणि ज्युलिएट'
निखिलने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, 'सध्या मला त्या चर्चांवर काहीही बोलायचे नाही. पण मला सध्या खूप छान वाटतंय, कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत. आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय. आम्ही खूप दिवसांनी भेटलो की अनेकदा एकत्र फोटो काढतो. त्यादिवशी वनिताच्या लग्नात आम्ही भेटलो. चांगला कॅमेरा होता, म्हणून फोटो काढला.'
पुढे तो म्हणाला, 'माझा कधी नव्हे ते त्या दिवशी आयुष्यात एक बरा फोटो आला आणि तो अपलोड केला तर त्यावरुन इतक्या बातम्या झाल्या. याच्या इतक्या बातम्या होतील असे मला वाटले नव्हते. पण ठिक आहे, मला आवडत आहे की लोकांच्या आपण इतके मनात आहोत. त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या बातम्या करा. आम्हाला काहीही हरकत नाही. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि तसेच कायम राहू.'