Amit Shah : सीमेवरील गावांमध्ये लोकसंख्येचा समतोल ढासळतोय; गृहमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा
Aug 19, 2022, 03:26 PM IST
- Amit Shah on National Security : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत मोठे यश सरकारला मिळाले आहे. यामुळे जम्मू-कश्मीरमधून दहशतवाद आणि ईशान्ये कंदील राज्यातील नक्षलवादी गटांसोबत चर्चा करण्याचा समावेश आहे.
Amit Shah on National Security : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत मोठे यश सरकारला मिळाले आहे. यामुळे जम्मू-कश्मीरमधून दहशतवाद आणि ईशान्ये कंदील राज्यातील नक्षलवादी गटांसोबत चर्चा करण्याचा समावेश आहे.
- Amit Shah on National Security : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत मोठे यश सरकारला मिळाले आहे. यामुळे जम्मू-कश्मीरमधून दहशतवाद आणि ईशान्ये कंदील राज्यातील नक्षलवादी गटांसोबत चर्चा करण्याचा समावेश आहे.
Amit Shah on National Security: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती भागात होणाऱ्या लोकसंख्या बदलांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रणनीति (एनएसएस) सम्मेलनात बोलताना त्यांनी ही गरज व्यक्त केली. अमित शहा यांनी या प्रकरणी गुरवारी अलर्ट जारी केला आहे. अमित शहा म्हणाले की, ही जबाबदारी पोलिस महासंचालकांची आहे. ते त्यांच्या राज्यात खासकरून सीमावर्ती जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या तांत्रिक आणि समारीक दृष्ट्या महत्वाची असेलेली माहिती मिळवणे गरजेचे आहे.
या सुरक्षा संमेलनात देशातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले आहेत. अमित शहा म्हणाले, सीमावर्ती भागातील डीजीपी यांनी सीमेवरील गावांमध्ये होणाऱ्या लोकसंख्या बदलावर सर्वाधिक नजर ठेवणे गरजेचे आहे. गृह मंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून केवळ देशाच्या आंतरिक सुरक्षेवरच नाही तर इतर आव्हाणांचाही सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य राज्यांनी द्यायला हवे: अमित शहा
अमित शाह या संमेलनात म्हणाले की, राज्यांनी राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित मुद्यांना प्राथमिकता देणे गरजेचे आहे. आंतरिक सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्यांवर सरकारला मोठे यश मिळाले आहे. ज्यात जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद आणि ईशान्येकडील राज्यातील उग्रवादी गटांसोबत डील करने सहभागी आहे. शहा म्हणाले, पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अशा अनेक योजना बनवल्या आहेत, ज्यामुळे राज्यांसोबत संवाद वाढवल्या जात आहे. या सोबतच त्यांना मोठा निधी देऊन मदत केली जात आहे.
डीजीपी कॉन्फरन्स मध्ये झाले मोठे बदल : शहा
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा म्हणाले, 'पीएम मोदीयांनी २०१४ पासून डीजीपी कॉन्फरन्समध्ये काही बदल केले आहेत. या बैठकांमध्ये अनेक समस्यांवरील उपाय सोधला जातो. देशात पाहिल्यांदाच राष्ट्रीय स्वचालित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली (NAFIS) विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील तळागळात पोहचवणे गरजेचे आहे.
विभाग