अजबच.. मुलाचे लग्न करून सून आणली घरात अन् पाच मुलांच्या आईने २४ वर्षीय तरुणाशी बांधली लग्नगाठ
Jan 16, 2023, 08:07 PM IST
एका विवाहित व पाच मुलांची आई असलेल्या महिलेने आपल्याहून निम्म्या वयाच्या तरुणाशी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे या महिलेच्या एका मुलाचे लग्नही झाले आहे.
एका विवाहित व पाच मुलांची आई असलेल्या महिलेने आपल्याहून निम्म्या वयाच्या तरुणाशी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे या महिलेच्या एका मुलाचे लग्नही झाले आहे.
एका विवाहित व पाच मुलांची आई असलेल्या महिलेने आपल्याहून निम्म्या वयाच्या तरुणाशी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे या महिलेच्या एका मुलाचे लग्नही झाले आहे.
म्हणतात ना की, प्रेम आंधळे असते. प्रेम कधीही आणि कोणाशीही होऊ शकते. प्रेम कधीच जात, पात, वय व आर्थिक स्थितीत पाहत नाही. एकदा कुणावर तरी जीव जडला की, संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीचेच होऊन जाते. प्रेम प्रकरणांच्या या मालिकेत आता एक नवीन प्रकरण जोडले गेले आहे. हे ऐकून लोकांनी तोंडात बोटे घातली आहेत. एका विवाहित महिलेचे २४ वर्षीय तरुणावर मन जडले. त्यानंतर तिने पतीला सोडून तरुणासोबत मंदिरात सात फेरे घेतले. आपल्यापेक्षा वयाने खूपच मोठ्या असलेल्या महिलेच्या गळ्यात तरुणाने मंगळसूत्र घातले व भांगात सिंधूर भरले. इतकेच नव्हे तर महिलेला आधीच पाच मुले असून मोठ्या मुलाचे लग्न करून महिलेने सूनेलाही घरात आणले आहे. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
हे प्रकरण लखीमपूर खीरी जिल्ह्यातील मोहम्मदी परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेचे लग्न बजरिया गावात झाले होते. तिला पाच मुले होती. पाच मुलांपैकी एका मुलाचे लग्नही झाले आहे. मुलाचे लग्न केल्यानंतर महिलेची ओळख एका २४ वर्षीय तरुणाशी झाली. दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र घरच्यांना याची काहीच माहिती नव्हती. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. महिला लपून-छपून तरुणाला भेटायला जात होती.
आपल्याहून कमी वयाच्या मुलाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महिला व तिच्या प्रियकराने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी मंदिरात पोहोचले. मंदिरात महिलेने आपल्याहून निम्म्या वयाच्या तरुणासोबत सात फेरे घेतले. दोघांच्या विवाहाचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. महिला व तिच्या प्रियकराने आता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, जात-बिरादरीवाले तसेच नातेवाईकांकडून जीवाला धोका आहे. त्यांच्याकडून धमक्या येत आहेत.