मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrashekhar bawankule : 'बावनकुळे मतिमंद' उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर ठाकरे गटातील आमदाराचा संताप

Chandrashekhar bawankule : 'बावनकुळे मतिमंद' उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर ठाकरे गटातील आमदाराचा संताप

Jul 11, 2023, 07:17 PM IST

  • Maharashtra politics : चंद्रशेखर बावनकुळे  हे स्वतः मतिमंद व्यक्ती आहेत,  असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली आहे.

Maharashtra politics

Maharashtra politics : चंद्रशेखर बावनकुळेहे स्वतः मतिमंद व्यक्ती आहेत, असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली आहे.

  • Maharashtra politics : चंद्रशेखर बावनकुळे  हे स्वतः मतिमंद व्यक्ती आहेत,  असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपकडून याचा जोरदार पलटवार केला जात आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष 'चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना जोडे मारू असे म्हटले होते. याला आता ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः मतिमंद व्यक्ती आहेत, असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरला लागलेला कलंक,अशी टीका केली होती. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत जर फडणवीसांवर बोलाल तर नागपूरची जनता ठाकरेंना जोडे मारेल, असं म्हटलं होतं. बावनकुळेंच्या या विधानावर नितीन देशमुख आक्रमक झाले आहेत.

नितीन देशमुख म्हणाले की, बावनकुळे मतिमंद आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंना जर चपलांनी मारण्याची भाषा कराल तर आम्ही शिवसैनिकांनी काही बांगड्या भरल्या नाहीत, असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.

पंतप्रधानांनी ज्या राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप लावला होता, त्याच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी तुमच्या सोबत आली, शपथविधी झाला मग हा महाराष्ट्राला कलंक नाही का?, असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

 

पंतप्रधानांनी हा कलंक महाराष्ट्राला लावलेला आहे. तुम्ही लावलेला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे जे काही बोलले ते योग्य बोलले. तुम्ही जर चपला मारण्याच्या गोष्टी कराल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे.

पुढील बातम्या