Agneepath Scheme : अग्निवीरांच्या भरतीसंदर्भात लष्कराची पत्रकार परिषद
Jun 19, 2022, 03:07 PM IST
- दरवर्षी तिन्ही दलात मिळून जवळपास १७ हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार असं त्यांनी कुणीही विचारत नसल्याचं लष्कराने म्हटलं आहे.
दरवर्षी तिन्ही दलात मिळून जवळपास १७ हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार असं त्यांनी कुणीही विचारत नसल्याचं लष्कराने म्हटलं आहे.
- दरवर्षी तिन्ही दलात मिळून जवळपास १७ हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार असं त्यांनी कुणीही विचारत नसल्याचं लष्कराने म्हटलं आहे.
Agneepath Scheme Protest : देशभरात लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. आता या प्रकरणावर लष्कराने पत्रकार परिषद गेत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करान म्हटलं की, आम्हाला यामध्ये जास्ती जास्त तरुण सहभागी व्हावेत असं वाटत होतं, तरुणांचा सळसळंत रक्त आणि बुद्धी याचा समतोल राखला जाईल. तुम्हाला माहिती आहे की लष्कराती निवृत्त किती होतात. दरवर्षी तिन्ही दलात मिळून जवळपास १७ हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार असं त्यांनी कुणीही विचारत नाही.
अग्निवीरांना नेहमीच्या सैनिकांपेक्षा कमी सुविधा मिळत असल्याचा आरोप होतोय. त्यावर लष्कराने म्हटलं की, "अग्निवीरांना सियाचीन आणि इतर काही भागात रेग्युलर सैनिकांना ज्या सुविधा आहेत त्याच दिल्या जातील. त्यांच्या सेवा आणि अटींमध्ये काही बदल नसेल. लष्करात सेवा करताना वीरमरण आल्यास अग्निवीरांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिले जातील."
सध्या आपण केवळ ४६ हजार सैनिकांची अग्निपथ योजनेतून भरती करत आहे. या योजनेची समीक्षा करण्यासाठी आपण कमी प्रमाणात भरती करत असून त्यादृष्टीने आवश्यक मूलभूत सोयीसुविधा आहेत की नाही हे तपासले जाईल असंही लष्कराने स्पष्ट केलं. यंदा ४६ हजारांची भरती करणार असलो तरी हे प्रमाण जवळपास १.२५ लाखापर्यंत जाईल अशी माहितीसुद्धा लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली.
अग्निवीरांबाबत गेल्या दोन दिवसात काही वेगवेगळ्या मंत्र्यांनी आणि विभागाकडून घोषणा केल्या गेल्या. त्याबाबत सांगताना लष्कराने म्हटलं की, मंत्र्यांनी आणि विभागाकडून आरक्षणाबाबत काही घोषणा केल्या गेल्या. त्या सर्व पूर्वनियोजीत होत्या. अग्निपथला होत असलेल्या विरोधानंतर तो निर्णय घेतला असे नाही.
एअर मार्शल एसके झा यांनी सांगितले की, "अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे रजिस्ट्रेशन २४ जूनला सुरू होईल. त्यानतंर २४ जुलैपासून पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेतल्या जातील. यातील पहिली बॅच डिसेंबर अखेरीस ट्रेनिंगसाठी दाखल होईल." व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, देशात २१ नोव्हेंबरपासून पहिला नौदलातील अग्निवीर त्याच्या ट्रेनिंगला सुरुवात करेल. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्हींना संधी असेल."