Shivsena vs BJP: नारायण राणेंनी सख्ख्या भावाची हत्या केली, त्यांची नार्को टेस्ट करा; शिवसेनेची मागणी
Jan 04, 2023, 07:25 AM IST
- ShivSena vs BJP In Konkan : राणेंच्या कारकिर्दीत कोकणात जेवढ्या हत्या झाल्या, त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली आहे.
ShivSena vs BJP In Konkan : राणेंच्या कारकिर्दीत कोकणात जेवढ्या हत्या झाल्या, त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली आहे.
- ShivSena vs BJP In Konkan : राणेंच्या कारकिर्दीत कोकणात जेवढ्या हत्या झाल्या, त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली आहे.
Shiv Sena MP Vinayak Raut On Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोकणात सख्या चुलत भावाची हत्या केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केला आहे. शिवसेनेच्या या गंभीर आरोपांमुळं खळबळ उडाली असून त्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. राणेंच्या मुलाची उंची किती, डोकं केवढं, अक्कल केवढी, मेंदू केवढा तरीही आकांडतांडव करायचं, असं म्हणत राऊतांनी नितेश राणेंवरही शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील कार्यक्रमात बोलताना खासदार विनायत राऊत म्हणाले की, आमदार नितेश राणेंनी त्यांच्या वडिलांची राजकीय कारकिर्द आठवावी. राणेंनी सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोके फोडून नांदगावात जाळून टाकलं. या हैवानांच्या औलादींची नार्को टेस्ट केली तर कोकणातील अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा होईल, असं सांगत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. कणकवलीच्या आमदाराची उंची किती, डोकं केवढं, अक्कल केवढी आणि मेंदू केवढा, तरीही आकांडतांडव करतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं एकच टार्गेट त्यांनी धरलेलं आहे. परंतु नारायण राणेंची नार्को टेस्ट झाल्यास कोकणातील रक्तरंजित इतिहास कुणी घडवला ते सर्वांना कळेल, असा इशारा विनायक राऊतांनी राणेंना दिला आहे.
नारायण राणेंनी ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगावं की, त्यांनी कोरोना काळात पनवेलच्या रुग्णालयात लोकांना फसवलं की नाही?, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला यांनी लुबाडलं. रुग्णालयात लाखोंचा करोडोंचा भ्रष्टाचार झाला. त्यामुळं आता हिम्मत असेल तर नारायण राणेंनी ऑडिटसाठी तयार रहायला हवं, असं खुलं आव्हान खासदार विनायक राऊतांनी राणेंना दिलं आहे. २०१४ साली जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात एकही राजकीय हत्या झाली नाही. शिवसेनेला शांततेद्वारे विकास करायचा असल्याचंही राऊत म्हणाले.