मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha Election: प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसची उमेदवारी?; 'वंचित' म्हणते…

Rajya Sabha Election: प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसची उमेदवारी?; 'वंचित' म्हणते…

May 20, 2022, 10:16 AM IST

    • वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवर पक्षानं भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवर पक्षानं भूमिका स्पष्ट केली आहे.

    • वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवर पक्षानं भूमिका स्पष्ट केली आहे.

पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातून वेगवेगळी नावं चर्चेत येऊ लागली आहेत. संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचं नाव पुढं आलं आहे. आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) या संदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्यात त्यांनी आंबेडकरांच्या उमेदवारीची चर्चा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. ‘ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असं 'वंचित’नं म्हटलं आहे.

'निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी जून महिन्यात निवडणूक होणार आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्षाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे पाच उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. सहावा उमेदवार कोण आणि प्रमुख पक्ष आपली अतिरिक्त मते कोणाच्या पारड्यात टाकणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या