Mahavitran : महावितरणचा थकबाकीदारांना शॉक.. ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
Mar 25, 2023, 09:48 PM IST
Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबाद - वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत औरंगाबाद परिमंडलातील ९ हजार ७१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.
थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या 'ऑन फिल्ड' आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. महावितरण संकेतस्थळ व अॅपद्वारे वीजबिल भरणा करण्याची 'ऑनलाइन' सोय उपलब्ध आहे.
औरंगाबाद परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील ३ लाख ७९ हजार ५४६ ग्राहकांकडे ६५० कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. शहर मंडलातील १ लाख १३ हजार १७४ ग्राहकांकडे ६० कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण मंडलातील १ लाख ५८ हजार ७४८ ग्राहकांकडे ३७० कोटी ५१ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. जालना मंडलातील १ लाख ७ हजार ६२४ ग्राहकांकडे २१९ कोटी ४७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी न भरणाऱ्या औरंगाबाद परिमंडलातील ९ हजार ७१ जणांचा वीजपुरवठा खंडित आला आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडलातील २०९५, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील ४०७१ तर जालना मंडलातील २९०५ ग्राहकांचा समावेश आहे.
विभाग