मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  primary School Timing : पुढच्या वर्षीपासून दुसरीपर्यंच्या शाळा सकाळी ९ नंतरच होणार सुरू!

primary School Timing : पुढच्या वर्षीपासून दुसरीपर्यंच्या शाळा सकाळी ९ नंतरच होणार सुरू!

Dec 19, 2023, 08:29 PM IST

  • Primary School timing Change : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी लवकर न भरवता, ९ नंतरच सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

Primary School timing Change : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी लवकर न भरवता, ९ नंतरच सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

  • Primary School timing Change : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी लवकर न भरवता, ९ नंतरच सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

पुढच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता २ री पर्यंचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू करण्याविषयी महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. राज्य सरकारने याबाबत एका तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून केली असून समितीच्या अहवालानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अवलंबले जाणार आहे. असे संकेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. नव्या धोरणानंतर पहिली व दुसरीचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, समितीच्या अहवालानंतर पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या काही वर्गाची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली.

नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरीचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या सकाळी लवकर शाळा भरत असल्यानेलहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या मेंदूमधील सिक्रेशनवर पडतो. यामुळे मुलांच्या मेंदूची वाढ खुंटते. हा सकाळच्या शाळांच्या वेळेचा विषय सरकारच्या विचाराधीन होताच. त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेची वेळ कोणत्याही परिस्थितीत सकाळी ९ च्या आधी नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनीही याबाबत भाष्य केले होते. मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सध्याची सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सात ऐवजी ९ पासून सुरू करण्याचे राज्यपाल म्हणाले होते. यामुळे मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल तसेच त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढेल.

५ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, सध्याच्या काळात मोठ्यांबरोबरच लहान मुलांच्या झोपण्याची पद्धत बदलली आहे. मुले मध्यरात्रीनंतरही जागे राहतात. मात्र त्यांना सकाळच्यी शाळा असल्याने लवकर उठावे लागते व त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे राज्य सरकारने शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, असे राज्यपालांनी म्हटले होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या